शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी अडत आहे ग्रामीणांचा प्रवास

By admin | Updated: November 26, 2014 23:04 IST

ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास

चंद्रपूर :ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास सहन करत शहर गाठावे लागते. मात्र रस्ता दुरुस्त करण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.रस्ता नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात आजही शासनाची बस पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली-निंबाळा, हिरापूर, चार्ली-निर्ली, साखरी-चिंचोली, कळमना, चिंचोली, चिंचोली-निमणी या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाल्याने रस्त्याअभावी या गावांमध्ये बस पोहोचत नसल्याचे विदारक वास्तव आहे. गावागावात रस्ते पोहोचले. मात्र, रस्त्याची अवस्था बघितली तर रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. एवढी रस्त्याची वाट लागली आहे. चिंचोली-कळमना हा मार्ग गडचांदूरला जाण्यासाठी सोयीचा आहे. मात्र, या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात न आल्याने रस्त्याचे बारा वाजले आहे. शासनाची गाव तिथे एसटी बस अशी योजना आहे. मात्र, अनेक गावात बस जायला रस्ते नसल्याने नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागतो.राजुरा तालुक्यातील निंबाळा, हिरापूर या गावाने अजूनपर्यंत गावात एसटी बस बघितली नाही. यावरून गावात रस्त्याची किती वाईट अवस्था आहे हे लक्षात येते. अनेकदा रस्त्याची तात्पूर्ती डागडुजी करून खड्डे बुजविले जातात. मात्र, अल्पावधीत रस्त्यांना अवकळा येते. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सरकारी यंत्रणा लक्ष देईल की असाच यातनामय प्रवास नागरिकांना करावा लागणार, हा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला छळत आहे. मूल तालुक्यातील अनेक गावांची तसेच कोरपना तालुक्यातील नवेगाव (बाखर्डी) येथील मार्गाची दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले असून वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही केली. मात्र, अद्यापही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. संंबंधित विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशई मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)