शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
3
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
4
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
5
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
6
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
7
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
8
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
9
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
10
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
11
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
12
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
13
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
14
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
15
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
16
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
17
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
18
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
19
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
20
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद

रस्त्याअभावी अडत आहे ग्रामीणांचा प्रवास

By admin | Updated: November 26, 2014 23:04 IST

ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास

चंद्रपूर :ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास सहन करत शहर गाठावे लागते. मात्र रस्ता दुरुस्त करण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.रस्ता नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात आजही शासनाची बस पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली-निंबाळा, हिरापूर, चार्ली-निर्ली, साखरी-चिंचोली, कळमना, चिंचोली, चिंचोली-निमणी या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाल्याने रस्त्याअभावी या गावांमध्ये बस पोहोचत नसल्याचे विदारक वास्तव आहे. गावागावात रस्ते पोहोचले. मात्र, रस्त्याची अवस्था बघितली तर रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. एवढी रस्त्याची वाट लागली आहे. चिंचोली-कळमना हा मार्ग गडचांदूरला जाण्यासाठी सोयीचा आहे. मात्र, या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात न आल्याने रस्त्याचे बारा वाजले आहे. शासनाची गाव तिथे एसटी बस अशी योजना आहे. मात्र, अनेक गावात बस जायला रस्ते नसल्याने नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागतो.राजुरा तालुक्यातील निंबाळा, हिरापूर या गावाने अजूनपर्यंत गावात एसटी बस बघितली नाही. यावरून गावात रस्त्याची किती वाईट अवस्था आहे हे लक्षात येते. अनेकदा रस्त्याची तात्पूर्ती डागडुजी करून खड्डे बुजविले जातात. मात्र, अल्पावधीत रस्त्यांना अवकळा येते. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सरकारी यंत्रणा लक्ष देईल की असाच यातनामय प्रवास नागरिकांना करावा लागणार, हा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला छळत आहे. मूल तालुक्यातील अनेक गावांची तसेच कोरपना तालुक्यातील नवेगाव (बाखर्डी) येथील मार्गाची दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले असून वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही केली. मात्र, अद्यापही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. संंबंधित विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशई मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)