शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

रस्त्याअभावी अडत आहे ग्रामीणांचा प्रवास

By admin | Updated: November 26, 2014 23:04 IST

ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास

चंद्रपूर :ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास सहन करत शहर गाठावे लागते. मात्र रस्ता दुरुस्त करण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.रस्ता नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात आजही शासनाची बस पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली-निंबाळा, हिरापूर, चार्ली-निर्ली, साखरी-चिंचोली, कळमना, चिंचोली, चिंचोली-निमणी या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाल्याने रस्त्याअभावी या गावांमध्ये बस पोहोचत नसल्याचे विदारक वास्तव आहे. गावागावात रस्ते पोहोचले. मात्र, रस्त्याची अवस्था बघितली तर रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. एवढी रस्त्याची वाट लागली आहे. चिंचोली-कळमना हा मार्ग गडचांदूरला जाण्यासाठी सोयीचा आहे. मात्र, या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात न आल्याने रस्त्याचे बारा वाजले आहे. शासनाची गाव तिथे एसटी बस अशी योजना आहे. मात्र, अनेक गावात बस जायला रस्ते नसल्याने नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागतो.राजुरा तालुक्यातील निंबाळा, हिरापूर या गावाने अजूनपर्यंत गावात एसटी बस बघितली नाही. यावरून गावात रस्त्याची किती वाईट अवस्था आहे हे लक्षात येते. अनेकदा रस्त्याची तात्पूर्ती डागडुजी करून खड्डे बुजविले जातात. मात्र, अल्पावधीत रस्त्यांना अवकळा येते. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सरकारी यंत्रणा लक्ष देईल की असाच यातनामय प्रवास नागरिकांना करावा लागणार, हा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला छळत आहे. मूल तालुक्यातील अनेक गावांची तसेच कोरपना तालुक्यातील नवेगाव (बाखर्डी) येथील मार्गाची दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले असून वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही केली. मात्र, अद्यापही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. संंबंधित विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशई मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)