शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

जबरानजोत कास्तकार उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:15 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकºयांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता.

ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता करावी : किसान सभेची चंद्रपुरात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता. या लॉंग मार्चमुळे महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा झाली. नाशिक ते मुंबई असा २०० किलोमीटरच्या अत्यंत अखतर प्रवास करत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांना शासनाने आश्वासन देवून माघारी पाठविले. मात्र अद्यापही आश्वासनानुसार कार्यवाहीला सुरूवात झाली नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेला दिला आहे.मोर्चेकरी किसान सभेच्या मागण्या मान्य करीत वनजमिनीचे मालकी हक्क सहा महिण्यात देणार, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथील करणार, कर्जमाफीसाठी २००१ पासून लाभ मिळणार, कृषिमुल्य आयोगावर किसान सभेचे सदस्य घेणार, संजय गांधी निराधार योजनेतील मानधनात वाढ करणार आदी मागण्या लेखी रूपात मान्य केल्या होत्या. या आश्वासनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून सर्व जबरानजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, बिगर आदिवासी करीता असलेली तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात किसान सभेच्या नेतृत्वात सर्व जबरानजोत कास्तकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी दिला आहे.किसान सभेच्या कार्यकर्त्यांची सभा मनोहर कोवे यांच्या अध्यक्षेखाली भानापेठ येथे पार पडली. सभेला गणपत लेनगुरे, शरद कोकोडे, विठ्ठल लोनबले, विलास बावणे, कमलाबाई रामटेके, सुखदेव मोहुर्ले, मोरेश्वर रामटेके, गजानन वाटगुरे, शंकर कोटरंगे, चोरगावच्या माजी सरपंच सुलोचना कोकोडे यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.