शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

जबरानजोत कास्तकार उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:15 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकºयांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता.

ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता करावी : किसान सभेची चंद्रपुरात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ ते १२ मार्च दरम्यान नाशिक ते मुंबई असा ३० हजार शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता. या लॉंग मार्चमुळे महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा झाली. नाशिक ते मुंबई असा २०० किलोमीटरच्या अत्यंत अखतर प्रवास करत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांना शासनाने आश्वासन देवून माघारी पाठविले. मात्र अद्यापही आश्वासनानुसार कार्यवाहीला सुरूवात झाली नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेला दिला आहे.मोर्चेकरी किसान सभेच्या मागण्या मान्य करीत वनजमिनीचे मालकी हक्क सहा महिण्यात देणार, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथील करणार, कर्जमाफीसाठी २००१ पासून लाभ मिळणार, कृषिमुल्य आयोगावर किसान सभेचे सदस्य घेणार, संजय गांधी निराधार योजनेतील मानधनात वाढ करणार आदी मागण्या लेखी रूपात मान्य केल्या होत्या. या आश्वासनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून सर्व जबरानजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, बिगर आदिवासी करीता असलेली तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात किसान सभेच्या नेतृत्वात सर्व जबरानजोत कास्तकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा किसान सभेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी दिला आहे.किसान सभेच्या कार्यकर्त्यांची सभा मनोहर कोवे यांच्या अध्यक्षेखाली भानापेठ येथे पार पडली. सभेला गणपत लेनगुरे, शरद कोकोडे, विठ्ठल लोनबले, विलास बावणे, कमलाबाई रामटेके, सुखदेव मोहुर्ले, मोरेश्वर रामटेके, गजानन वाटगुरे, शंकर कोटरंगे, चोरगावच्या माजी सरपंच सुलोचना कोकोडे यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.