शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीमधून वर्धा नदी वाहते. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना वरोरा बाजार पेठ जवळ पडते. परंतु वर्धा नदीवर पूल नसल्याने आजपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक वरोरा शहराकडे फारसे येत नव्हते. काही वर्षापूर्वी वरोरा तालुक्यातील मार्डा गावाजवळ वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयावरुन हलके चार चाकी, दुचाकी व बैलबंडी सहज नेता येत असल्याने व वरोरा शहराचे अंतर कमी असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा, मसरा, कामींडा, चोपन आदी गावांतील नागरिक विविध कामांसाठी वरोरा शहरात येतात. त्यामुळे सध्या वरोरा बाजारपेठेला सुगीचे दिवस आले आहे. मात्र वर्धा नदीच्या बंधाºयापासून तर वरोरा शहराजवळील माझरी रस्त्यापर्यंत सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी रस्ता दबला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविने वाहन धारकांना कठीण झाले आहे.मार्डा रस्त्यालगत समाज भवन, नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा व तिन जिनिंग आहे. यासोबतच वरोरा परिसरातील नागरिकांच्या शेतात जाण्याकरिता या रस्त्याचा उपयोग केला जातो. मागील काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याकडे संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष परसला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक