शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

उड्डाणपुलाचा वळणरस्ता वाहतुकीस अयोग्य

By admin | Updated: September 17, 2016 01:28 IST

राजुरा ते बामणी दरम्यान आंतरराज्यीय मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून कासवगतीने सुरू आहे

चालकाचे बेहाल : कंत्राटदार व अभियंता कुंभकर्णी झोपेतराजुरा : राजुरा ते बामणी दरम्यान आंतरराज्यीय मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. त्यासाठी तयार केलेला वळण रस्ता पावसाच्या पहिल्या सरीने उखडून मोठे खड्डे पडले. त्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. वाहनाची तुटफुट व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र कंत्राटदार व अभियंता कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे पावसाळा संपल्यानंतर तरी दुरुस्तीसाठी जाग येणार काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.राजुरा-बामणी या आंतरराज्यीय मार्गावर रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम धुमधडाक्यात सुरू करण्यात आले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या निष्क्रीयतेमुळे बांधकामास ग्रहण लागले. वास्तविक पाहता करारनाम्यानुसार दोन वर्षात बांधकाम पूर्ण करावयाचे होते. परंतु, तीन वर्ष झाले तरीपण काम अर्धवट आहे. बांधकामास अडचण येवू नये यासाठी पर्यायी वळण रस्त्याची तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यानुसार अंतरराज्यीय मार्गावरील वाहतुकीच्या क्षमतेनुसार रस्ता तयार करून घेणे अभियंत्याचे कर्तव्य होते. हा रस्ता थातूरमातूर तयार करण्यात आला असून तीन वर्षापासून पावसाळ्यात वळण रस्ता दबून उखडत आहे. पावसात खड्यात पाणी साचून वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. परंतु, दररोज येणेजाणे करणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच कसरत होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)