शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

उड्डाणपुलाचा वळणरस्ता वाहतुकीस अयोग्य

By admin | Updated: September 17, 2016 01:28 IST

राजुरा ते बामणी दरम्यान आंतरराज्यीय मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून कासवगतीने सुरू आहे

चालकाचे बेहाल : कंत्राटदार व अभियंता कुंभकर्णी झोपेतराजुरा : राजुरा ते बामणी दरम्यान आंतरराज्यीय मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. त्यासाठी तयार केलेला वळण रस्ता पावसाच्या पहिल्या सरीने उखडून मोठे खड्डे पडले. त्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. वाहनाची तुटफुट व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र कंत्राटदार व अभियंता कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे पावसाळा संपल्यानंतर तरी दुरुस्तीसाठी जाग येणार काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.राजुरा-बामणी या आंतरराज्यीय मार्गावर रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम धुमधडाक्यात सुरू करण्यात आले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या निष्क्रीयतेमुळे बांधकामास ग्रहण लागले. वास्तविक पाहता करारनाम्यानुसार दोन वर्षात बांधकाम पूर्ण करावयाचे होते. परंतु, तीन वर्ष झाले तरीपण काम अर्धवट आहे. बांधकामास अडचण येवू नये यासाठी पर्यायी वळण रस्त्याची तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यानुसार अंतरराज्यीय मार्गावरील वाहतुकीच्या क्षमतेनुसार रस्ता तयार करून घेणे अभियंत्याचे कर्तव्य होते. हा रस्ता थातूरमातूर तयार करण्यात आला असून तीन वर्षापासून पावसाळ्यात वळण रस्ता दबून उखडत आहे. पावसात खड्यात पाणी साचून वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. परंतु, दररोज येणेजाणे करणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच कसरत होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)