शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

चंद्रपूर जिल्ह्यात नदीकाठावरील ग्रामीण भागाला अजूनही पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 20:31 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. काही मार्ग अजूनही बंदच आहेत.

चंद्रपूर : मंगळवार आणि बुधवारी काही वेळ रिमझिम पाऊस आला असला तरी पावसाने या दोन दिवसात बऱ्यापैकी उसंत घेतली. मात्र इतर जिल्ह्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. काही मार्ग अजूनही बंदच आहेत.

वरोरा तालुक्यातील नऊ गावांना फटका

वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावरील गावांना पुराचा वेढा कायम असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. तब्बल नऊ गावांना पुराचा फटका बसला. या गावांमधील १५०० लोकांना आतापर्यंत सुरक्षितस्थळी हलविले असून मदतकार्य सुरू आहे. तालुक्यातील करंजी, आष्टी कुचना,पाटाळा, माजरी, नागरी, सोईट निलजई आमडी, दिंडोडा, बांबर्डा इत्यादी गावांमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून घरात ठेवलेले खत आणि बी-बियाणे वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. पूर परिस्थिती बघता आतापर्यंत जवळपास १२० कुटुंबांना जिल्हा परिषद शाळा माजरी आणि वरोरा येथील काही मंगल कार्यालयात हलविले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. खैरी वडकीकडे जाणारा मार्ग अजूनही बंद आहे. तसेच या पुलाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. याशिवाय वणीकडे जाणारी वाहतूकही थांबविण्यात आली आहे. एचडीआरएफच्या दोन चमू व एनडीआरएफच्या दोन चमू बचाव पथक म्हणून तैनात केले आहे.

किर्र अंधार अन् पुराचा वेढा

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे माजरीजवळच्या पाटाळा येथील गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून कित्येक कुटुंबांनी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाटाळा गावामधून जवळपास ३५० लोकांना बोटीने कुचना येथे हलविण्यात आले. तर मणगाव येथे बुधवारी सकाळी गावाच्या सभोवताली पाणी झाल्याने १५० लोकांना बोटीच्या साहाय्याने कुचना येथे नेण्यात आले. पुरातून बाहेर काढलेल्या लोकांची राहण्याची, जेवण्याची सोय वेकोलीने सामुदायिक भवन कुचना येथे व नागलोन व कुचना ग्रामपंचायतीनेसुद्धा जनतेची राहण्याची सोय केली आहे. माजरी वस्तीमध्ये आठ फूट पाणी साचले असून जि.प. शाळा, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाणी शिरले आहे. पूर असलेल्या मनगाव, राळेगाव, थोरणा, पाटाळा,पळसगाव, माजरी येथे वीजपुरवठा नसल्याने रात्री किर्र अंधार असतो.

जुनगावचा संपर्क तुटला

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव पाण्याने वेढले आहे. त्यामुळे जुनगावचा संपर्क आठ दिवसांपासून इतर गावांशी तुटला आहे.

लाखोंचे रासायनिक खत पाण्यात

राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र शेतात पुराचे पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनी शेतात वर्षभरासाठी शेत पिकांकरिता साठविलेले रासायनिक खत पाण्यात विरघळले तर बहुतांश खत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

बल्लारपूर तालुक्यातील हे मार्ग बंद

पाण्याचा प्रकोप वाढत असल्याने कोठारी - तोहगाव, बल्लारपूर- राजुरा, सास्ती- राजुरा, कोठारी - कवडजई, माना - चारवट-हडस्ती, पळसगाव - कवडजई हे मार्ग बंद झाले आहे. बल्लारपूर तालक्यातील पळसगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली आहे. रोवणी सुरू असताना संपूर्ण पऱ्हे काढून पूर्ण शेतात पसरवून ठेवले होते. सोमवारी व मंगळवारी अचानक नाल्याला आलेल्या पुराने, काढून ठेवलेले पऱ्हे वाहून गेले आहे. याशिवाय बामणी-राजुरा मार्गावर वर्धा नदीचे पाणी एक किलोमीटर समोर आले आहे.

कोरपना तालुक्यातही काही मार्ग बंदच

वणी ते कोरपना मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील शिरपूरजवळ कंटेनर फसला आहे. याला दोन दिवस उलटूनही काढण्यात न आल्याने सद्य:स्थितीत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याचा फटका जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे, तर वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे भोयगाव ते धानोरा मार्ग बंद पडलेला आहे. परिणामी वाहनाच्या लांबच लांब रांगा रस्त्याने लागल्या आहे. राजुरा-कवठाला मार्गावर गोवरीजवळ ट्रक फसल्याने हाही मार्ग १५ तासांपासून ठप्प पडला आहे. वर्धा नदीवरील राजुरा, सास्ती, घुग्घुस, मुंगोली, पाटाळा या चार प्रमुख पुलावर पाणी असल्याने कोरपनासह राजुरा, जिवती तालुक्याचा जिल्हा मुख्यालय चंद्रपूरशी संपर्क तुटला आहे. कोरपना-भोयगाव मार्गही बंदच आहे. याशिवाय तेलंगणाकडे जाणारी आंतररज्यीय वाहतूकही बंद आहे.

टॅग्स :floodपूर