शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात नदीकाठावरील ग्रामीण भागाला अजूनही पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 20:31 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. काही मार्ग अजूनही बंदच आहेत.

चंद्रपूर : मंगळवार आणि बुधवारी काही वेळ रिमझिम पाऊस आला असला तरी पावसाने या दोन दिवसात बऱ्यापैकी उसंत घेतली. मात्र इतर जिल्ह्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. काही मार्ग अजूनही बंदच आहेत.

वरोरा तालुक्यातील नऊ गावांना फटका

वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावरील गावांना पुराचा वेढा कायम असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. तब्बल नऊ गावांना पुराचा फटका बसला. या गावांमधील १५०० लोकांना आतापर्यंत सुरक्षितस्थळी हलविले असून मदतकार्य सुरू आहे. तालुक्यातील करंजी, आष्टी कुचना,पाटाळा, माजरी, नागरी, सोईट निलजई आमडी, दिंडोडा, बांबर्डा इत्यादी गावांमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून घरात ठेवलेले खत आणि बी-बियाणे वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. पूर परिस्थिती बघता आतापर्यंत जवळपास १२० कुटुंबांना जिल्हा परिषद शाळा माजरी आणि वरोरा येथील काही मंगल कार्यालयात हलविले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. खैरी वडकीकडे जाणारा मार्ग अजूनही बंद आहे. तसेच या पुलाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. याशिवाय वणीकडे जाणारी वाहतूकही थांबविण्यात आली आहे. एचडीआरएफच्या दोन चमू व एनडीआरएफच्या दोन चमू बचाव पथक म्हणून तैनात केले आहे.

किर्र अंधार अन् पुराचा वेढा

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे माजरीजवळच्या पाटाळा येथील गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून कित्येक कुटुंबांनी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाटाळा गावामधून जवळपास ३५० लोकांना बोटीने कुचना येथे हलविण्यात आले. तर मणगाव येथे बुधवारी सकाळी गावाच्या सभोवताली पाणी झाल्याने १५० लोकांना बोटीच्या साहाय्याने कुचना येथे नेण्यात आले. पुरातून बाहेर काढलेल्या लोकांची राहण्याची, जेवण्याची सोय वेकोलीने सामुदायिक भवन कुचना येथे व नागलोन व कुचना ग्रामपंचायतीनेसुद्धा जनतेची राहण्याची सोय केली आहे. माजरी वस्तीमध्ये आठ फूट पाणी साचले असून जि.प. शाळा, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाणी शिरले आहे. पूर असलेल्या मनगाव, राळेगाव, थोरणा, पाटाळा,पळसगाव, माजरी येथे वीजपुरवठा नसल्याने रात्री किर्र अंधार असतो.

जुनगावचा संपर्क तुटला

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव पाण्याने वेढले आहे. त्यामुळे जुनगावचा संपर्क आठ दिवसांपासून इतर गावांशी तुटला आहे.

लाखोंचे रासायनिक खत पाण्यात

राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र शेतात पुराचे पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनी शेतात वर्षभरासाठी शेत पिकांकरिता साठविलेले रासायनिक खत पाण्यात विरघळले तर बहुतांश खत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

बल्लारपूर तालुक्यातील हे मार्ग बंद

पाण्याचा प्रकोप वाढत असल्याने कोठारी - तोहगाव, बल्लारपूर- राजुरा, सास्ती- राजुरा, कोठारी - कवडजई, माना - चारवट-हडस्ती, पळसगाव - कवडजई हे मार्ग बंद झाले आहे. बल्लारपूर तालक्यातील पळसगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली आहे. रोवणी सुरू असताना संपूर्ण पऱ्हे काढून पूर्ण शेतात पसरवून ठेवले होते. सोमवारी व मंगळवारी अचानक नाल्याला आलेल्या पुराने, काढून ठेवलेले पऱ्हे वाहून गेले आहे. याशिवाय बामणी-राजुरा मार्गावर वर्धा नदीचे पाणी एक किलोमीटर समोर आले आहे.

कोरपना तालुक्यातही काही मार्ग बंदच

वणी ते कोरपना मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील शिरपूरजवळ कंटेनर फसला आहे. याला दोन दिवस उलटूनही काढण्यात न आल्याने सद्य:स्थितीत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याचा फटका जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे, तर वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे भोयगाव ते धानोरा मार्ग बंद पडलेला आहे. परिणामी वाहनाच्या लांबच लांब रांगा रस्त्याने लागल्या आहे. राजुरा-कवठाला मार्गावर गोवरीजवळ ट्रक फसल्याने हाही मार्ग १५ तासांपासून ठप्प पडला आहे. वर्धा नदीवरील राजुरा, सास्ती, घुग्घुस, मुंगोली, पाटाळा या चार प्रमुख पुलावर पाणी असल्याने कोरपनासह राजुरा, जिवती तालुक्याचा जिल्हा मुख्यालय चंद्रपूरशी संपर्क तुटला आहे. कोरपना-भोयगाव मार्गही बंदच आहे. याशिवाय तेलंगणाकडे जाणारी आंतररज्यीय वाहतूकही बंद आहे.

टॅग्स :floodपूर