शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नद्या, तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:56 IST

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मागील अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. सूर्याच्या या उग्र रुपामुळे पाण्याचा जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या व आणखी जे जलसाठे असतील, त्यांनी तळ गाठला आहे. वर्धा, वैनगंगा या मोठ्या नद्याही आटत आहेत.

ठळक मुद्देभीषण स्थिती : पाण्याची तजवीज करताना तारेवरची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मागील अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. सूर्याच्या या उग्र रुपामुळे पाण्याचा जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या व आणखी जे जलसाठे असतील, त्यांनी तळ गाठला आहे. वर्धा, वैनगंगा या मोठ्या नद्याही आटत आहेत. ग्रामीण भागातील हे जलस्रोतच झपाट्याने खाली गेल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे, यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून जुलै महिन्यात येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामाची सुरुवात पाण्याविना कशी करायची, याची चिंता शेतकऱ्यांना आतापासूनच वाटू लागली आहे. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकºयांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकºयांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही.मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे पाण्याचे पुनर्भरण निट होऊ शकले नाही. जिल्ह्यात ९७ तलाव आहेत. या तलावांची स्थिती अत्यंत नाजुक आहे. यातील निम्याहून अधिक तलाव आता कोरडे पडले आहे. याशिवाय जिल्ह्यात इरई, उमा, शिरणा, वर्धा, वैनगंगा यासारख्या नद्या वाहतात. मात्र या नद्यांनीही तळ गाठला आहे.वर्धा नदी अनेक गावांची जीवनदायिनी आहे. मात्र या नदीलाही आता डबक्याचे स्वरुप आले आहे. जिल्ह्यातील नलेश्वर, पकडीगुड्डम, डोंगरगाव, आसोलामेंढा, लभानसराड, अमलनाला यासारख्या सिंचन प्रकल्पात सरासरी ३० टक्क्याहून कमी जलसाठा आहे.या जलसाठ्यांमध्ये पाणी नसल्याने गावातील विहिरी, बोअरवेल, हातपंप यासारखे इतर जलस्रोत आटले आहे. काही ठिकाणी विहिरींमध्ये पाणी असले तरी ते गाळयुक्त आहे. त्यामुळे पाण्याची भीषण अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांना खरिपाची चिंताआता लवकरच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. शेतकरी उन्हाची तमा न बाळगता हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. जिल्ह्यातील ८८ तलावांमध्ये सध्या केवळ सरासरी ९ टक्केच पाणी आहे. पुढे पाऊस लांबला तर मोठी भयावह स्थिती निर्माण होणार आहे.चंद्रपुरातील वैयक्तिक जलस्रोतही आटलेचंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या सर्वच धरणातील जलसाठा अंतिम पातळी गाठत असला तरी इरई धरणात बऱ्यापैकी पाणी आहे. तरीही चंद्रपूरकरांना नियमित पाणी मिळत नाही. शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी जिवाच्या आकांताने बोंबा मारल्या जात आहेत. हातात असतानाही मनपा प्रशासन याबाबत काहीच का करीत नाही, ही बाब संताप आणणारी ठरली आहे. याशिवाय सर्वात गंभीर बाब म्हणजे चंद्रपुरातील अनेक घरांमधील विहिरी, बोअरवेल, हातपंप या वैयक्तिक जलस्रोतांनीही तळ गाठला आहे. अनेकांच्या विहिरी आटल्या आहेत. बोअरवेलला पाणी नाही. यापूर्वी पिण्यापुरते नळाला पाणी आले तरी दैनंदिन इतर गरजा नागरिक आपल्या वैयक्तिक जलस्रोतातून पूर्ण करीत होते. मात्र आता बहुतांश नागरिकांना सर्व कामांसाठी नळाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. नळ आला नाही तर ऐन उन्हाळ्यात घरातील कुलर बंद ठेवावा लागत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई