शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धानपिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:40 IST

भिसी तसेच चिमूर तालुक्यात यावर्षीच्या हंगामात पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. बोडी तलाव पावसाळा संपण्याच्या मार्गावर आला तरी रिकामेच आहेत.

ठळक मुद्दे बोडी-तलाव रिकामेच : पाण्याची भीषण समस्या उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : भिसी तसेच चिमूर तालुक्यात यावर्षीच्या हंगामात पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. बोडी तलाव पावसाळा संपण्याच्या मार्गावर आला तरी रिकामेच आहेत.चिमूर तालुक्यातील महत्त्वाचे पिक धान (तांदूळ) असून यावर्षी तालुक्यातील ८०-९० गावातील धान रोवणी पावसाअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे धानाची शेती पडलेल्या अवस्थेत आहेत. गेल्या ३०-३५ वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच बोडी-तलाव रिकामे आहेत. एरवी पावसाळ्यात जुलै अखेरपर्यंत सर्व बोडी, तलाव पावसाने भरलेले असायचे. बाहेर पाणी वाहायचं, पण या पावसाळ्यातील परिस्थिती उलटी आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकºयांनी काही प्रमाणात रोवणी केली. परंतु धानाच्या रोवणीचा हंगाम संपल्यातच असल्याने धानपिक होणार की नाही ही शंकाच आहे.१६ आॅगस्ट २०१७ ला चिमूरला क्रांतीदिनी मोठा कार्यक्रम झाला. स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूरला आले. पण या कार्यक्रमात शेतकºयांच्या प्रश्नाबाबत कुणीच काही बोलले नाही. यावेळी शेतकरी दुर्लक्षित दिसून आला. आपल्या प्रास्ताविक भाषणातून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबद्दल धान समस्या, गोसीखुर्द पाणी समस्या व इतर बाबतीत लक्ष केंद्रीत करणे आवश्यक होते. परंतु धान समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. आज चिमूर तालुक्यातील शेतकºयांची परिस्थिती गंभीर आहे. तलाव-बोडीत पाणी नसल्याने पुढील पिक कसे घेणार, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यावर्षी नदीचा महापूर काय, पण साधा पूरही तालुक्यातील लोकांनी पाहिला नाही. नदी-नाले रिकामेच दिसतात. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊन पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. महाराष्ट्राचे शासनही कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांचे शोषण करताना दिसते. मदतीचा हात देण्याऐवजी शेतकºयांचे अश्रू पुसण्याऐवजी शेतकºयांच्या तोंडाला कोरडी पाने पुसण्याचा प्रकार सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकºयांनी केली आहे.