शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धानपिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:40 IST

भिसी तसेच चिमूर तालुक्यात यावर्षीच्या हंगामात पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. बोडी तलाव पावसाळा संपण्याच्या मार्गावर आला तरी रिकामेच आहेत.

ठळक मुद्दे बोडी-तलाव रिकामेच : पाण्याची भीषण समस्या उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : भिसी तसेच चिमूर तालुक्यात यावर्षीच्या हंगामात पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. बोडी तलाव पावसाळा संपण्याच्या मार्गावर आला तरी रिकामेच आहेत.चिमूर तालुक्यातील महत्त्वाचे पिक धान (तांदूळ) असून यावर्षी तालुक्यातील ८०-९० गावातील धान रोवणी पावसाअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे धानाची शेती पडलेल्या अवस्थेत आहेत. गेल्या ३०-३५ वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच बोडी-तलाव रिकामे आहेत. एरवी पावसाळ्यात जुलै अखेरपर्यंत सर्व बोडी, तलाव पावसाने भरलेले असायचे. बाहेर पाणी वाहायचं, पण या पावसाळ्यातील परिस्थिती उलटी आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकºयांनी काही प्रमाणात रोवणी केली. परंतु धानाच्या रोवणीचा हंगाम संपल्यातच असल्याने धानपिक होणार की नाही ही शंकाच आहे.१६ आॅगस्ट २०१७ ला चिमूरला क्रांतीदिनी मोठा कार्यक्रम झाला. स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूरला आले. पण या कार्यक्रमात शेतकºयांच्या प्रश्नाबाबत कुणीच काही बोलले नाही. यावेळी शेतकरी दुर्लक्षित दिसून आला. आपल्या प्रास्ताविक भाषणातून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबद्दल धान समस्या, गोसीखुर्द पाणी समस्या व इतर बाबतीत लक्ष केंद्रीत करणे आवश्यक होते. परंतु धान समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. आज चिमूर तालुक्यातील शेतकºयांची परिस्थिती गंभीर आहे. तलाव-बोडीत पाणी नसल्याने पुढील पिक कसे घेणार, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यावर्षी नदीचा महापूर काय, पण साधा पूरही तालुक्यातील लोकांनी पाहिला नाही. नदी-नाले रिकामेच दिसतात. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊन पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. महाराष्ट्राचे शासनही कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांचे शोषण करताना दिसते. मदतीचा हात देण्याऐवजी शेतकºयांचे अश्रू पुसण्याऐवजी शेतकºयांच्या तोंडाला कोरडी पाने पुसण्याचा प्रकार सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकºयांनी केली आहे.