शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

पेरलेली बियाणे करपण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:25 IST

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : राजुरा तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी पाऊस भरपूर पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला प्रारंभ झाला. तीन-चार दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतीकामांना चांगलाच वेग येऊन राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यावर्षी निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईल असे वाटत असतानाच पावसाने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे.गेल्यावर्षी बोंडअळीच्या तडाख्याने शेतकरी हतबल झाला. उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून महागडे बियाणे जमिनीत टाकले. मात्र आठवडा उलटायला आला तरी पावसाचा पत्ता नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस येईल, अशी आस शेतकऱ्यांना लागली.हवामान खात्याने २० जून नंतरच पाणी येईल, असा अंदाज वर्तविला आहे. कपाशीचे बीज अंकुरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांनी विकत घेतलेले महागडे बियाणे मातीमोल होण्याचा धोका आहे. शेतकºयांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. हे शेतकऱ्यांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे.निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी शेतकºयांकडे बियाणे घ्यायला पैसे नव्हते. उसणवारी करुन पैशाची जुळवाजुळव केली. मात्र पाऊस असा अचानक बेपत्ता झाल्याने श्ेतकरी पूर्णत: निराश झाला आहे. खरीप हंगामाच्या ऐन तोंडावर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.मृगाचा पाऊस पडल्याने दीर्घ उघडीप होईल. त्यामुळे पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. परंतु, हा संदेश शेतकºयांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे सुरुवातीला नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दुबार पेरणीचे संकटमृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकºयांनी लगबगीने कपासीची लागवड केली. त्यानंतर सलग चार दिवस बºयापैकी पाऊस आला. यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल, असे वाटत असतानाच पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. पाऊस आला नाही, तर दुबार पेरणी करण्याची वेळ काही शेतकºयांवर येऊ शकते.उन्हाचा तळाखापेरणी करणारे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. तर दुसरीकडे प्रचंड उन्ह तापत असल्याने पेरलेल्या बियाण्यांचे काय होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. पावसाने दीर्घ खंड दिल्यास बियाणे जमिनीत खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान बºयाच शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. पुरेसा पाऊस आल्यास पेरणीची लगबग सुरू होईल.