शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेली बियाणे करपण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:25 IST

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : राजुरा तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी पाऊस भरपूर पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला प्रारंभ झाला. तीन-चार दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतीकामांना चांगलाच वेग येऊन राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यावर्षी निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईल असे वाटत असतानाच पावसाने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे.गेल्यावर्षी बोंडअळीच्या तडाख्याने शेतकरी हतबल झाला. उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून महागडे बियाणे जमिनीत टाकले. मात्र आठवडा उलटायला आला तरी पावसाचा पत्ता नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस येईल, अशी आस शेतकऱ्यांना लागली.हवामान खात्याने २० जून नंतरच पाणी येईल, असा अंदाज वर्तविला आहे. कपाशीचे बीज अंकुरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांनी विकत घेतलेले महागडे बियाणे मातीमोल होण्याचा धोका आहे. शेतकºयांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. हे शेतकऱ्यांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे.निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी शेतकºयांकडे बियाणे घ्यायला पैसे नव्हते. उसणवारी करुन पैशाची जुळवाजुळव केली. मात्र पाऊस असा अचानक बेपत्ता झाल्याने श्ेतकरी पूर्णत: निराश झाला आहे. खरीप हंगामाच्या ऐन तोंडावर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.मृगाचा पाऊस पडल्याने दीर्घ उघडीप होईल. त्यामुळे पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. परंतु, हा संदेश शेतकºयांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे सुरुवातीला नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दुबार पेरणीचे संकटमृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकºयांनी लगबगीने कपासीची लागवड केली. त्यानंतर सलग चार दिवस बºयापैकी पाऊस आला. यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल, असे वाटत असतानाच पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. पाऊस आला नाही, तर दुबार पेरणी करण्याची वेळ काही शेतकºयांवर येऊ शकते.उन्हाचा तळाखापेरणी करणारे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. तर दुसरीकडे प्रचंड उन्ह तापत असल्याने पेरलेल्या बियाण्यांचे काय होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. पावसाने दीर्घ खंड दिल्यास बियाणे जमिनीत खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान बºयाच शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. पुरेसा पाऊस आल्यास पेरणीची लगबग सुरू होईल.