शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

जादुटोण्याच्या संशयावरुन हत्येचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 22:47 IST

विज्ञानाचे युगात वावरतांना मोबाईल, फोनसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गावखेड्यातील लोकही वापर करतात. मात्र, सोळाव्या शतकातील भूत, करणी, जादुटोणा यासारख्या अस्तित्वहिन

सिंदेवाही : विज्ञानाचे युगात वावरतांना मोबाईल, फोनसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गावखेड्यातील लोकही वापर करतात. मात्र, सोळाव्या शतकातील भूत, करणी, जादुटोणा यासारख्या अस्तित्वहिन गोष्टींवर विश्वास ठेवतात. चंद्रपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेपोटी हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.जुलै महिन्यात बल्लारपूरजवळ जादुटोण्याच्या संशयातून शंकर हरी पिंपळकर या इसमाचा अंधश्रद्धा जमावाने हत्या केली. १६ आॅक्टोबरला कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे भूत उतरविण्याच्या नावाखाली काकानेच पुतण्याचा बळी घेतला आणि आता सिंदेवाही तालुक्यातील सावरगाटा येथे जादुटोणा केल्याच्या संशयापायी दिवाळीच्या दिवशी राजेंद्र ठाकरे नावाच्या युवकाचा खून करण्यात आला.यासंदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी म्हटले आहे, ‘जादुटोण्याने माणसं मारता आली असती तर शासनाने सैन्यात मांत्रीकाची भरती केली नसती का? एवढा साधा तर्क गेली अनेक वर्षापासून आम्ही लोकांना समजावून सांगत आहोत. एवढचं नाही तर मंत्राने भाजला पापड जरी मोडून दाखविला तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती २१ लाख रुपयाचे बक्षीस देते. पण या प्रबोधनापेक्षा त्यांच्यावर अंधश्रद्धांचा पगडा कायम रहावा यासाठी सतत सुरू असलेल्या कार्यक्रमांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे आजही अंधश्रद्धेपोटी होणाऱ्या खुनांचे प्रमाण वाढत आहे. ज्या परिसरात या घटना घडतात तेथील स्थानिक सुशिक्षित अजूनही अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायला उत्सुक नाहीत ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने २६ आॅगस्ट २०१३ पासून ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम’ लागू केला आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यास कमीत कमी सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड ते सात वर्षे कारावास आणि ५० हजार रुपयापर्यंत दंड असे शिक्षेचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या व्यक्तींवर जादुटोण्याचा संशय घेतला जातो अशा व्यक्तींनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी किंवा अंनिसच्या कोणत्याही शाखेला लेखी कळवावे, असे आवाहन विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)