शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भर पावसात बजावला मतदानाचा हक्क

By admin | Updated: July 10, 2016 00:35 IST

कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले.

ग्रामपंचायत निवडणूक : कोरपना-८२, राजुरा-७५ तर जिवती-६५ टक्के मतदानचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले. यात कोरपना तालुक्यात ८२ टक्के, राजुरा तालुक्यात ७५ टक्के तर जिवती तालुक्यात ६५ टक्के मतदान झाले. शनिवारी दिवसभर संततधार पाऊस असल्यामुळे मतदानाची टक्केवारी निम्म्यावर जाईल, असे वाटत होते. मात्र भर पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. जिवती : जिवती तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. एकूण ११७ जागेसाठी ४१३ उमेदवार रिंगणात होते. दिवसभर तालुक्यात पाऊस पडत असला तरी अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपली जबाबदारी पार पडली. प्रारंभी सकाळी दोन-चार नागरिकच मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. मात्र पाऊस उसंत घेणार नाही, हे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे सुरू केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यातील मतदान ४० टक्के होते. सायंकाळी अखेरपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. कोरपना : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीकरिता मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने मतदानाची तयारी केली. चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कोरपना तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, भाजप व शिवसेनासह पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. बऱ्याच ठिकाणी पॅनल तयार करून निवडणुका लढविल्या जात आहे. या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात, हे निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे. शनिवारी सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात २२२ जागाकरिता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत २९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.राजुरा : राजुरा तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. राजुरा तालुक्यात एकूण २४ ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान, आज शनिवारी मतदानाच्या दिवशीच दिवसभर पाऊस असल्याने नागरिकांना छत्र्या, रेनकोट घालूनच मतदानासाठी जावे लागले. सकाळी काही प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. मात्र दुपारच्या सुमारास अचानक गर्दी कमी झाली. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार, असे शासकीय यंत्रणेला वाटत होते. मात्र दुपारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडताना दिसून आले. सायंकाळी अखेरपर्यंत तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. (लोकमत चमू)नांदा येथे मशीनमध्ये बिघाड; काही काळ मतदान ठप्पनांदा येथे मशिनमध्ये बिघाड असल्याने काही वेळ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. परंतु बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पुर्ववत मतदान सुरू झाले. सर्वात मोठी हीच नांदा ग्रामपंचायत निवडणूक असून या ठिकाणी सर्वच पक्षानी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत निवडणुकीवर मतदान करण्याकरिता गोविंदपुर येथील नागरिकांना येता आले नाही. परसोडा गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी असल्याने गोविंदपुर येथील नागरिक मतदानापासून वंचित राहले.यासोबतच अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने तेथील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.फिरत्या पोलीस पथकाची मतदारांसोबत हुजतजिवती : जिवती तालुक्यातील २२ पैकी २० ग्रामपंचायतीची निवडणूक असून यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवाात आला. अगोदरच अतिसंवेदनशील असलेल्या या तालुक्यात व्यवस्थित मतदान व्हावे, यासाठी जिल्हाभरातील पोलीस बळ जिवतीत दाखल करण्यात आले. पण काही ठिकाणी पोलीसदादांकडून मतदारांसोबत हुजत घातल्याचे दिसून आले. नोकेवाडा ग्रा.पं.ची आज निवडणूक असून गावातील मतदार विष्णू खंडेकर हा जिवती येथे राहून पंचायत समितीची गाडी चालवितो. आज मतदान करण्यासाठी तो नोकेवाडा येथे आला असता फिरते पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने तु इथे कसा आला? तुझे इथे काय काम म्हणून हुज्जत घातली व मतदान करण्यास मज्जाव केला. या फिरत्या पोलीस पथकाने नोकेवाडा येथील मतदान केंद्रावर आपली गाडी थांबवून मतदारांवर दबाव टाकल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले.