शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

भर पावसात बजावला मतदानाचा हक्क

By admin | Updated: July 10, 2016 00:35 IST

कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले.

ग्रामपंचायत निवडणूक : कोरपना-८२, राजुरा-७५ तर जिवती-६५ टक्के मतदानचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले. यात कोरपना तालुक्यात ८२ टक्के, राजुरा तालुक्यात ७५ टक्के तर जिवती तालुक्यात ६५ टक्के मतदान झाले. शनिवारी दिवसभर संततधार पाऊस असल्यामुळे मतदानाची टक्केवारी निम्म्यावर जाईल, असे वाटत होते. मात्र भर पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. जिवती : जिवती तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. एकूण ११७ जागेसाठी ४१३ उमेदवार रिंगणात होते. दिवसभर तालुक्यात पाऊस पडत असला तरी अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपली जबाबदारी पार पडली. प्रारंभी सकाळी दोन-चार नागरिकच मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. मात्र पाऊस उसंत घेणार नाही, हे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे सुरू केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यातील मतदान ४० टक्के होते. सायंकाळी अखेरपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. कोरपना : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीकरिता मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने मतदानाची तयारी केली. चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कोरपना तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, भाजप व शिवसेनासह पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. बऱ्याच ठिकाणी पॅनल तयार करून निवडणुका लढविल्या जात आहे. या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात, हे निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे. शनिवारी सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात २२२ जागाकरिता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत २९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.राजुरा : राजुरा तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. राजुरा तालुक्यात एकूण २४ ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान, आज शनिवारी मतदानाच्या दिवशीच दिवसभर पाऊस असल्याने नागरिकांना छत्र्या, रेनकोट घालूनच मतदानासाठी जावे लागले. सकाळी काही प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. मात्र दुपारच्या सुमारास अचानक गर्दी कमी झाली. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार, असे शासकीय यंत्रणेला वाटत होते. मात्र दुपारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडताना दिसून आले. सायंकाळी अखेरपर्यंत तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. (लोकमत चमू)नांदा येथे मशीनमध्ये बिघाड; काही काळ मतदान ठप्पनांदा येथे मशिनमध्ये बिघाड असल्याने काही वेळ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. परंतु बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पुर्ववत मतदान सुरू झाले. सर्वात मोठी हीच नांदा ग्रामपंचायत निवडणूक असून या ठिकाणी सर्वच पक्षानी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत निवडणुकीवर मतदान करण्याकरिता गोविंदपुर येथील नागरिकांना येता आले नाही. परसोडा गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी असल्याने गोविंदपुर येथील नागरिक मतदानापासून वंचित राहले.यासोबतच अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने तेथील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.फिरत्या पोलीस पथकाची मतदारांसोबत हुजतजिवती : जिवती तालुक्यातील २२ पैकी २० ग्रामपंचायतीची निवडणूक असून यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवाात आला. अगोदरच अतिसंवेदनशील असलेल्या या तालुक्यात व्यवस्थित मतदान व्हावे, यासाठी जिल्हाभरातील पोलीस बळ जिवतीत दाखल करण्यात आले. पण काही ठिकाणी पोलीसदादांकडून मतदारांसोबत हुजत घातल्याचे दिसून आले. नोकेवाडा ग्रा.पं.ची आज निवडणूक असून गावातील मतदार विष्णू खंडेकर हा जिवती येथे राहून पंचायत समितीची गाडी चालवितो. आज मतदान करण्यासाठी तो नोकेवाडा येथे आला असता फिरते पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने तु इथे कसा आला? तुझे इथे काय काम म्हणून हुज्जत घातली व मतदान करण्यास मज्जाव केला. या फिरत्या पोलीस पथकाने नोकेवाडा येथील मतदान केंद्रावर आपली गाडी थांबवून मतदारांवर दबाव टाकल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले.