शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात बजावला मतदानाचा हक्क

By admin | Updated: July 10, 2016 00:35 IST

कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले.

ग्रामपंचायत निवडणूक : कोरपना-८२, राजुरा-७५ तर जिवती-६५ टक्के मतदानचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले. यात कोरपना तालुक्यात ८२ टक्के, राजुरा तालुक्यात ७५ टक्के तर जिवती तालुक्यात ६५ टक्के मतदान झाले. शनिवारी दिवसभर संततधार पाऊस असल्यामुळे मतदानाची टक्केवारी निम्म्यावर जाईल, असे वाटत होते. मात्र भर पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. जिवती : जिवती तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. एकूण ११७ जागेसाठी ४१३ उमेदवार रिंगणात होते. दिवसभर तालुक्यात पाऊस पडत असला तरी अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपली जबाबदारी पार पडली. प्रारंभी सकाळी दोन-चार नागरिकच मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. मात्र पाऊस उसंत घेणार नाही, हे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे सुरू केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यातील मतदान ४० टक्के होते. सायंकाळी अखेरपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. कोरपना : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीकरिता मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने मतदानाची तयारी केली. चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कोरपना तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, भाजप व शिवसेनासह पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. बऱ्याच ठिकाणी पॅनल तयार करून निवडणुका लढविल्या जात आहे. या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात, हे निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे. शनिवारी सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात २२२ जागाकरिता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत २९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.राजुरा : राजुरा तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. राजुरा तालुक्यात एकूण २४ ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान, आज शनिवारी मतदानाच्या दिवशीच दिवसभर पाऊस असल्याने नागरिकांना छत्र्या, रेनकोट घालूनच मतदानासाठी जावे लागले. सकाळी काही प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. मात्र दुपारच्या सुमारास अचानक गर्दी कमी झाली. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार, असे शासकीय यंत्रणेला वाटत होते. मात्र दुपारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडताना दिसून आले. सायंकाळी अखेरपर्यंत तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. (लोकमत चमू)नांदा येथे मशीनमध्ये बिघाड; काही काळ मतदान ठप्पनांदा येथे मशिनमध्ये बिघाड असल्याने काही वेळ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. परंतु बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पुर्ववत मतदान सुरू झाले. सर्वात मोठी हीच नांदा ग्रामपंचायत निवडणूक असून या ठिकाणी सर्वच पक्षानी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत निवडणुकीवर मतदान करण्याकरिता गोविंदपुर येथील नागरिकांना येता आले नाही. परसोडा गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी असल्याने गोविंदपुर येथील नागरिक मतदानापासून वंचित राहले.यासोबतच अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने तेथील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.फिरत्या पोलीस पथकाची मतदारांसोबत हुजतजिवती : जिवती तालुक्यातील २२ पैकी २० ग्रामपंचायतीची निवडणूक असून यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवाात आला. अगोदरच अतिसंवेदनशील असलेल्या या तालुक्यात व्यवस्थित मतदान व्हावे, यासाठी जिल्हाभरातील पोलीस बळ जिवतीत दाखल करण्यात आले. पण काही ठिकाणी पोलीसदादांकडून मतदारांसोबत हुजत घातल्याचे दिसून आले. नोकेवाडा ग्रा.पं.ची आज निवडणूक असून गावातील मतदार विष्णू खंडेकर हा जिवती येथे राहून पंचायत समितीची गाडी चालवितो. आज मतदान करण्यासाठी तो नोकेवाडा येथे आला असता फिरते पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने तु इथे कसा आला? तुझे इथे काय काम म्हणून हुज्जत घातली व मतदान करण्यास मज्जाव केला. या फिरत्या पोलीस पथकाने नोकेवाडा येथील मतदान केंद्रावर आपली गाडी थांबवून मतदारांवर दबाव टाकल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले.