शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गावकऱ्यांना मिळणार सरपंच निवडीचा अधिकार

By admin | Updated: December 21, 2015 00:59 IST

ग्रामीण विकासाला चालना मिळावी, गाव पातळीवर सरपंचांना निर्णय क्षमतेत वाढीसाठी ग्रामपंचायत कायद्यात बदलाची शक्यता वाढली आहे.

शासनस्तरावर हालचाली : ग्रामपंचायत कायद्यात बदलाची शक्यताबल्लारपूर : ग्रामीण विकासाला चालना मिळावी, गाव पातळीवर सरपंचांना निर्णय क्षमतेत वाढीसाठी ग्रामपंचायत कायद्यात बदलाची शक्यता वाढली आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येत आहे. गावातील मतदारांच्या माध्यमातून थेट सरपंच निवडण्याचा अधिकार लवकरच दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तशा शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.गावाचा प्रमुख म्हणून सरपंच निवडण्याचे सर्वाधिकार मध्य प्रदेश सरकारने जनतेला दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण मतदारांना थेट सरपंच निवडता यावा, यासाठी राज्याच्या ग्रामपंचायतअधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल करावा लागणार असून वरिष्ठ पातळीवर खलबते केली जात आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यातील २७ हजार ८३१ ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाची निवड प्रक्रिया करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.आजघडीला राज्यात ग्रामपंचायत अधिनियमानुसार राज्याच्या ग्रामीण भागातील मतदार प्रभाग निहाय सदस्य सदस्य निवडून देतात. एका ग्रामपंचायतीत कमीत कमी सात व जातस्तीतजास्त १७ सदस्य निवडण्याची प्रक्रिया मतदानातून केली जाते. निवडून आलेल्या सदस्यातून बहुमताच्या आधारे सरपंचांची निवड करण्यात येते. ग्रामपंचायत अधिनियमात बदल झाल्यावर थेट मतदार सरपंच निवडणार आहेत. गावातील सरपंच योग्य प्रकारे काम करीत नसेल तर त्याला पदमुक्त करण्याची तरतूदही नवीन अधिनियमात करण्याची शक्यता आहे.सरपंचपदाची निवड थेट मतदारातून केल्यास सरपंचाला सदस्यांच्या मर्जीनुसार काम करावे लागणार नाही. सरपंचांची निर्णय क्षमता वाढणार आहे. यातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. तत्परतेने विकासाचे निर्णय घेतले जातील. सदस्याची निवड करताना केवळ वॉर्डाचा विचार केला जातो. परिणामी सर्वांगीण गाव विकासाचे स्वप्न अपुरे राहते. आपल्या गावाचा संपूर्ण विकासासाठी कोणती व्यक्ती योग्य आहे, हे निवडण्याचे स्वातंत्र्य गावातील मतदारांना मिळणार आहे. हा विचार बाळगून त्या दिशेने अधिनियमात बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्राम स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना हा निर्णय घेण्यामागे असल्याचे सांगितले जाते. (शहर प्रतिनिधी)२७ हजार ८३१ ग्रामपंचायतींना मिळणार थेट कारभारीग्रामीण भागाच्या विकासाठी ग्रामपातळीवर विकासासाठी ग्रामपंचायत, तालुक्याच्यासाठी पंचायत समिती व जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातील १३१४, अकोला ५४३, अमरावती ८३९, औरंगाबाद ८५६, बीड १०२०, भंडारा ५३८, बुलढाणा ८६८, चंद्रपूर ८४६, धुळे ५५०, गडचिरोली ४६७, गोंदिया ५४९, हिंगोली ५६५, जळगाव ११५१, जालना ७७६, कोल्हापूर १०२९, लातूर ७८३, नागपूर ७६९, नांदेड १३०८, नंदूरबार ५०१, नाशिक १३७५, उस्मानाबाद ६२२, पालघर ४७७, परभणी ७०४, पुणे १४०६, रायगड ८२४, रत्नागिरी ८४४, सांगली ७०४, सातारा १५००, सिंधुदुर्ग ४३२, सोलापूर १०३०, ठाणे ४३३, वर्धा ५१३, वाशिम ४९३ व यवतमाळ जिल्ह्यातील १२०२ अशा एकूण २७ हजार ८३१ ग्रामपंचायतीवर थेट मतदारातून सरपंच म्हणून कारभारी निवडले जाणार आहेत.