शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा

By admin | Updated: May 22, 2014 23:47 IST

सावली तालुक्यात येणार्‍या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. ग्राहकांची बोंब

उपरी : सावली तालुक्यात येणार्‍या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. ग्राहकांची बोंब असूनही संबंधित विभाग मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकात शासनाच्या कार्यप्रणालीबाबत रोष व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने मागील तीन महिन्यापूर्वी नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदुळ ३ रु. प्रति किलो तर गहू २ रु. प्रति किलो प्रमाणे धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हे धान्य अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य देण्याची अंमलबजावणी केली. यात अंत्योदय, बिपीेल कार्डधारकांचा समावेश आहे. यापूर्वी एका राशन कार्डवर ३५ किलो धान्य मिळत होते. मात्र अन्न सुरक्षा योजना आल्यापासून अंत्योदय कार्ड धारकांना ३५ किलो धान्य तर बिपीएल कार्डधारकांना प्रत्येक मताला ५ किलो धान्य देण्यात येत आहे. यामुळे बर्‍याच कुटुंबाना या योजनेचा फटका बसला आहे. दोन-तीन जणांचे कुटुंब असल्यास त्या कुटुंबास फक्त १० ते १५ किलो धान्य मिळत आहे. यात महिनाभराचे राशन घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे या योजनेत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे एपीेल काळे धारकांचे तांदुळ गहू पुर्णत: बंद झाल्याने कार्ड धारकांना धान्य पुरवठा करण्यात यावा अशीही मागणी होत आहे. सदर योजना लागू झाल्यापासून मागील तीन महिन्यापासून साखर पुरवठा बंद पडला असल्याने स्वस्त धान्य दुकानातील साखर नागरिकांसाठी कडू झाली आहे. तर दुसरीकडे स्वस्त दरात धान्य पुरवठा होत असल्याने स्वस्त धान्य दुकानात येणारा गहू निकृष्ट दर्जाचा, सडका पद्धतीचा येत आहे. स्वस्त धान्य दुकानदार त्या गव्हाची विल्हेवाट कार्डधारकांकडे लावत आहे. त्यामुळे नागरिकात बोंब उडाली आहे. शासनाने नागरिकांना स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असला तरी निकृष्ठ दर्जाच्या धान्य पुरवठामुळे शासनाच्या योजनेच्या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तेव्हा शासनाने यावर ठोस भुमिका घेऊन स्वस्त धान्य दुकानात उत्कृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)