शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नुकसानभरपाई हक्कापासून रोहयो मजूर वंचित

By admin | Updated: May 27, 2014 00:42 IST

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत

वडाळा

(तु) : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत मजुरी घेण्याचा हक्क आहे. जर १५ दिवसात मजुरी मिळाली नाही तर वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार रोहयो मजूर नुकसान भरपाई घेण्यास पात्र ठरण्याचाही हक्क आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून वरिष्ठांकडे रोहयो मजुरांनी लेखी स्वरूपात मागणी करूनसुद्धा अजूनपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांकडून दिरंगाई होत असून रोहयो कायद्यातील तरतुदीची पायमल्ली होत असल्याने सदर प्रकार अधिकार्‍यांवर भोवण्याची शक्यता आहे.

भद्रावती

तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमी योजनेच्या कामाला वेग आला आहे. परंतु कायद्यानुसार मिळणार्‍या मूलभूत सुविधा यांचा संपूर्णपणे अभाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रोहयो कायद्यात समाविष्ठ असलेल्या मजुरांच्या हक्काचीच पायमल्ली होताना दिसत आहे. हप्ता संपल्यानंतर कामाची मोजणी करून १५ दिवसाच्या आत मजुरांना मजुरी मिळाली नाही तर, वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार मजुरांना नुकसान भरपाई मागण्याचा हक्क आहे.

कामाच्या

सुरवातीपासूनच हप्ता संपल्यानंतर कामाची मोजणी करून १५ दिवसाचे आत कोणत्याही मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. उलट कमीत कमी दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी आणि काही मजुरांना एक वर्ष होऊनही मजुरी मिळत नसल्याने मजुरांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांनी कायद्यानुसार वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार नुकसान भरपाई मिळण्याकरिता भद्रावतीचे तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून नियमित पाठपुरावा केला. त्यात वडाळा (तु), वायगाव (तु), चिचोली, खुटवंडा, कोंठेगाव, मुधोली या गावातील मजूर प्रामुख्याने पुढे आले. तहसीलदारांकडे वडाळा येथील मजुरांनी अर्ज करून सहा-सात महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापही मजुरांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे वडाळा येथील मजुरांनी पर्यावरण मित्र संस्था विरूर (स्टेशन) चे भद्रावती तालुक्यातील माधव जिवतोडे व शंकर भरडे यांना आपले प्रतिनिधी नेमून त्यांच्या मार्फतीने रोहयो उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा केला.

नुकसान

भरपाईच्या प्रकरणची दखल घेऊन सदर प्रकरण आपल्या अधिनिस्त असल्याने कारवाई करावी, असे तहसीलदार भद्रावती यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु कसलीही नुकसानभरपाई मजुरांना आतापर्यंत मिळाली नाही. प्रशासकीय अधिकारी मजुरांवर अन्याय करीत असून त्यांच्या हक्काची पायमल्ली करीत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

ग्रामीण

विभागातील रोहयो मजुरांमध्ये रोहयो प्रशासकीय विभागाचे विरोधात असंतोष पसरत आहे. त्यात नुकसान भरपाईसाठी सर्व रोहयो मजूर आंदोलनाच्या तयारीला लागले आहे. त्वरित भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)