शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाई हक्कापासून रोहयो मजूर वंचित

By admin | Updated: May 27, 2014 00:42 IST

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत

वडाळा

(तु) : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत मजुरी घेण्याचा हक्क आहे. जर १५ दिवसात मजुरी मिळाली नाही तर वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार रोहयो मजूर नुकसान भरपाई घेण्यास पात्र ठरण्याचाही हक्क आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून वरिष्ठांकडे रोहयो मजुरांनी लेखी स्वरूपात मागणी करूनसुद्धा अजूनपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांकडून दिरंगाई होत असून रोहयो कायद्यातील तरतुदीची पायमल्ली होत असल्याने सदर प्रकार अधिकार्‍यांवर भोवण्याची शक्यता आहे.

भद्रावती

तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमी योजनेच्या कामाला वेग आला आहे. परंतु कायद्यानुसार मिळणार्‍या मूलभूत सुविधा यांचा संपूर्णपणे अभाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रोहयो कायद्यात समाविष्ठ असलेल्या मजुरांच्या हक्काचीच पायमल्ली होताना दिसत आहे. हप्ता संपल्यानंतर कामाची मोजणी करून १५ दिवसाच्या आत मजुरांना मजुरी मिळाली नाही तर, वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार मजुरांना नुकसान भरपाई मागण्याचा हक्क आहे.

कामाच्या

सुरवातीपासूनच हप्ता संपल्यानंतर कामाची मोजणी करून १५ दिवसाचे आत कोणत्याही मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. उलट कमीत कमी दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी आणि काही मजुरांना एक वर्ष होऊनही मजुरी मिळत नसल्याने मजुरांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांनी कायद्यानुसार वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार नुकसान भरपाई मिळण्याकरिता भद्रावतीचे तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून नियमित पाठपुरावा केला. त्यात वडाळा (तु), वायगाव (तु), चिचोली, खुटवंडा, कोंठेगाव, मुधोली या गावातील मजूर प्रामुख्याने पुढे आले. तहसीलदारांकडे वडाळा येथील मजुरांनी अर्ज करून सहा-सात महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापही मजुरांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे वडाळा येथील मजुरांनी पर्यावरण मित्र संस्था विरूर (स्टेशन) चे भद्रावती तालुक्यातील माधव जिवतोडे व शंकर भरडे यांना आपले प्रतिनिधी नेमून त्यांच्या मार्फतीने रोहयो उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा केला.

नुकसान

भरपाईच्या प्रकरणची दखल घेऊन सदर प्रकरण आपल्या अधिनिस्त असल्याने कारवाई करावी, असे तहसीलदार भद्रावती यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु कसलीही नुकसानभरपाई मजुरांना आतापर्यंत मिळाली नाही. प्रशासकीय अधिकारी मजुरांवर अन्याय करीत असून त्यांच्या हक्काची पायमल्ली करीत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

ग्रामीण

विभागातील रोहयो मजुरांमध्ये रोहयो प्रशासकीय विभागाचे विरोधात असंतोष पसरत आहे. त्यात नुकसान भरपाईसाठी सर्व रोहयो मजूर आंदोलनाच्या तयारीला लागले आहे. त्वरित भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)