शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

नुकसानभरपाई हक्कापासून रोहयो मजूर वंचित

By admin | Updated: May 27, 2014 00:42 IST

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत

वडाळा

(तु) : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत मजुरी घेण्याचा हक्क आहे. जर १५ दिवसात मजुरी मिळाली नाही तर वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार रोहयो मजूर नुकसान भरपाई घेण्यास पात्र ठरण्याचाही हक्क आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून वरिष्ठांकडे रोहयो मजुरांनी लेखी स्वरूपात मागणी करूनसुद्धा अजूनपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांकडून दिरंगाई होत असून रोहयो कायद्यातील तरतुदीची पायमल्ली होत असल्याने सदर प्रकार अधिकार्‍यांवर भोवण्याची शक्यता आहे.

भद्रावती

तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमी योजनेच्या कामाला वेग आला आहे. परंतु कायद्यानुसार मिळणार्‍या मूलभूत सुविधा यांचा संपूर्णपणे अभाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रोहयो कायद्यात समाविष्ठ असलेल्या मजुरांच्या हक्काचीच पायमल्ली होताना दिसत आहे. हप्ता संपल्यानंतर कामाची मोजणी करून १५ दिवसाच्या आत मजुरांना मजुरी मिळाली नाही तर, वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार मजुरांना नुकसान भरपाई मागण्याचा हक्क आहे.

कामाच्या

सुरवातीपासूनच हप्ता संपल्यानंतर कामाची मोजणी करून १५ दिवसाचे आत कोणत्याही मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. उलट कमीत कमी दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी आणि काही मजुरांना एक वर्ष होऊनही मजुरी मिळत नसल्याने मजुरांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांनी कायद्यानुसार वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार नुकसान भरपाई मिळण्याकरिता भद्रावतीचे तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून नियमित पाठपुरावा केला. त्यात वडाळा (तु), वायगाव (तु), चिचोली, खुटवंडा, कोंठेगाव, मुधोली या गावातील मजूर प्रामुख्याने पुढे आले. तहसीलदारांकडे वडाळा येथील मजुरांनी अर्ज करून सहा-सात महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापही मजुरांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे वडाळा येथील मजुरांनी पर्यावरण मित्र संस्था विरूर (स्टेशन) चे भद्रावती तालुक्यातील माधव जिवतोडे व शंकर भरडे यांना आपले प्रतिनिधी नेमून त्यांच्या मार्फतीने रोहयो उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा केला.

नुकसान

भरपाईच्या प्रकरणची दखल घेऊन सदर प्रकरण आपल्या अधिनिस्त असल्याने कारवाई करावी, असे तहसीलदार भद्रावती यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु कसलीही नुकसानभरपाई मजुरांना आतापर्यंत मिळाली नाही. प्रशासकीय अधिकारी मजुरांवर अन्याय करीत असून त्यांच्या हक्काची पायमल्ली करीत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

ग्रामीण

विभागातील रोहयो मजुरांमध्ये रोहयो प्रशासकीय विभागाचे विरोधात असंतोष पसरत आहे. त्यात नुकसान भरपाईसाठी सर्व रोहयो मजूर आंदोलनाच्या तयारीला लागले आहे. त्वरित भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)