शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

क्रांती जिल्ह्याचा विसर

By admin | Updated: August 14, 2015 01:25 IST

भारताच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरुद्ध ‘चले जाव’चे आंदोलन करुन १६ आॅगस्ट १९४२ ला मोठे आंदोलन करण्यात आले.

३५ वर्षे जुनी मागणी : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली होती दखलराजकुमार चुनारकर  खडसंगीभारताच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरुद्ध ‘चले जाव’चे आंदोलन करुन १६ आॅगस्ट १९४२ ला मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्नल क्रांतीकारण शहीद झाले. त्यामुळे चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी ३५ वर्षापासून अनेक आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काही महिन्यापासून जिल्हा निर्मितीचे आंदोलन थंड पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्ह्याची ज्योत मालवली काय, असा प्रश्न चिमूरवासीयांना पडला आहे.देशात इंग्रज राजवट असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता मोठा सहभाग घेतला व अनेक क्रांतीकारकांनी बलीदान दिले. इंग्रज राजवटीपूर्वी चिमूर जिल्हा असल्याचे स्वातंत्र संग्राम सैनिकाकडून सांगण्यात येत होते. त्याचाच धागा पकडून मागील ३५ वर्षापासून चिमूरला चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे काँग्रेस पासून इतरही पक्ष लक्ष देत नसल्याने ही मागणी मागे पडली आहे. मात्र चिमूर जिल्हा कृती समितीकडून निवेदने पत्र व्यवहार काही प्रमाणात सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.चिमूर परिसरातील नागरिकांचा भावनिक प्रश्न असल्याने या मागणीकरिता अनेक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आंदोलने केली आहेत. ५ जानेवारी २००५ मध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये हजारोच्या जमावाने तहसील कार्यालय जाळले. त्यामध्ये अनेक नागरिकांना तुरुंगामध्ये जावे लागले होते. त्यानंतरही हे जिल्हा निर्मितीचे आंदोलन सुरुच होते. निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पुढारी या मागणीचा उहापोह करुन मत मागतात. मात्र निवडणूक संपली की या मागणीला बाजूला सारतात. त्यामुळे चिमूरकर या राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासनाने विटले आहेत. चिमूरकरांनी चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीकरिता अनेक आंदोलने केली तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गजानन बुटके यांनी उपविभागीय कार्यालयावर चिमूर क्रांती जिल्हा कार्यालय, असा प्रतिकात्मक फलक लावून आंदोलन केले.मात्र दरम्यान तोडफोड झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये जावे लागले. त्यामुळे अनेक आंदोलने केली. मात्र चिमूरकरांच्या पदरी शासनाकडून निराशाचे आली आहे. मात्र एक वर्षापासून कुठल्याही हालचाली नसल्याने चिमूरक्रांती जिल्ह्याची ज्योत मालवली तर नाही ना, असा प्रश्न चिमूर परिसरातील नागरिकांना पडला आहे.स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचीही जिल्हा आंदोलनात उडी१९४२ च्या क्रांती लढ्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे (गुरुजी) व स्वर्गीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रभाकर जोशी यांनी चिमूर जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात उडी घेत अनेक आंदोलने केली. त्यामध्ये काळे गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे. तर प्रभाकर जोशी यांनी हयात असताना शासनाला चिमूर जिल्हा झाला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला होता. या आत्मदहनाची दखल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेत पत्रव्यवहार करुन जोशी यांना आत्मदहन करण्यापासून रोखले होते. आजघडीला ९३ वर्षीय काळे गुरुजी चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीवर ठाम असून मरेपर्यंत चिमूर जिल्ह्यासाठी संघर्ष करणार असल्याचे ठासून सांगतात.चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी ३५ वर्षे जुनी असून चिमूर जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षिय कृती समिती स्थापली आहे. या कृती समितीकडून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. या समितीच्या वतीने मागच्या वर्षी १ आॅगस्ट ते १६ आॅगस्टदरम्यान आंदोलने केली. तर आजही कृती समितीद्वारे जिल्ह्यासाठी शासनदरबारी मुख्यमंत्री, महसूलमंत्री व पालकमंत्री यांना पत्र व्यवहार सुरु आहे. चिमूर जिल्हा होईपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्ह्याची ज्योत आजही मालवली नसून ती तेवत आहे. - नरेंद्र बंडे (राजुरकर) अध्यक्ष,चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती