शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पथदर्शी योजनांचा आयुक्तांकडून आढावा

By admin | Updated: July 10, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांना विविध योजनांच्यामार्फत मोठया प्रमाणात जलस्त्रोत उभारण्यासाठी पथदर्शी योजना कार्यरत आहेत.

अधिकाऱ्यांना सूचना : पूरक यंत्रणा उभारण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांना विविध योजनांच्यामार्फत मोठया प्रमाणात जलस्त्रोत उभारण्यासाठी पथदर्शी योजना कार्यरत आहेत. या योजना १०० टक्के यशस्वी होतील, यासाठी शासकीय यंत्रणेने पाठपुरावा करावा. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वषार्तून दोन पिके घेण्यासाठी प्रवृत्त करता येईल. त्यासाठी पूरक यंत्रणा जिल्हा परिषद प्रशासनाने उभारावी, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकूमार यांनी काल शनिवारी दिले. सिदेंवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना मत्सव्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षण दिल्यानंतर अनुपकूमार यांनी चंद्र्रपूर जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्याने रूजू झालेल्या विविध पदावरील तरूण अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील जनतेच्या उत्थानासाठी आपल्या सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य शासनाला २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्ज माफी करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी जलयुक्त शिवार, माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिंचन विहिरी उभारणे, सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण करणे, तसेच आवश्यक वीज जोडण्या व मोटरपंप उपलब्ध करणे यासाठी योग्य नियोजन करण्याचे त्यांनी आवाहन केले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी वेगवेगळ्या पूरक यंत्रणा निर्माण करणे, हे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले पाहिजे. शासनाने यासाठी अनेक योजनांची निर्मिती केली आहे. जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्ससंवर्धन यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यावेळी उपस्थित कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी योजनांच्या माध्यमातून झालेल्या बदलाला लक्षात घेऊन शेतकरी आपला पिकपॅटर्न बदलतील, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सवयी, सुविधा लक्षात घेऊन शौचालयाच्या निर्मितीसाठी योग्य पर्याय पुढे करावे, स्वच्छ भारत कोषचा योग्य वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. जिल्हा परिषदेने केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात यंत्रणेने मागे राहू नये, असे आवाहन त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, माजी मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवन, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवार, सिमेंट बंधारे या सर्व योजनांचा त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये साचलेल्या जलाशयाच्या पातळीला त्यांनी जाणून घेतले.