शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाच्या आडकाठीत पहाडावर हरितक्रांतीचे स्वप्न भंगले !

By admin | Updated: May 16, 2016 00:57 IST

पहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी.

२ कोटी १३ लाखांचा दंड : ठेकेदाराने केले काम बंदशंकर चव्हाण - जिवतीपहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. त्यातून शेतीच्या उत्पन्नात भर पडेल व आर्थिक स्थिती सुधारेल, या हेतूने जिवती येथे लघुसिंचन विभागाकडून तलावाचे काम मंजूर झाले. काम जोमात असतानाच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंचन तलावाच्या कामावर भेट देवून संबंधित कंत्राटदारावर २ कोटी १३ लाखाचा दंड ठोठावल्याने तलावाचे काम बंद करून कंत्राटदार निघून गेला. परिणामी पहाडावर हरितक्रांती निर्माण होण्याचे स्वप्न भंगले आहे.वर्षानुवर्षे पावसाचा अनियमितपणा व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात बरीच घट झाली आहे. पहाडावर ९० टक्के शेतकरी असून कोरडवाहू शेतीच्या उत्पन्नावरच आपल्या संसाराचा गाडा चालवितात. जवळपास सिंचनाची सोय नसल्याने लवकरच शेतीची कामे आटोपली जातात. त्यानंतर रोजीरोटी कमविण्यासाठी इतरत्र वणवण भटकण्याची वेळ वर्षानुवर्षे बघायला मिळते.जिवतीत लघुसिंचाई विभागाकडून सिंचन तलावाचे काम मंजूर झाल्याने जिवती, देवलागुडा, लोलडोहसह परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सिंचन व्यवस्थेवर आधारित शेती करण्याचे स्वप्न बघत होते पण दुष्काळात तेरावा महिना, या उक्तीप्रमाणे त्यात महसूल विभागाची आडकाठी आली अन् काम बंद पडले. हरित क्रांतीचे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगणार की काय असा प्रश्नही आता शेतकऱ्यांना पडला आहे. महसूल विभागाने कारवाई केली. सिंचन तलावाचे काम बंद पडले. आता पुढे काय, कोरडवाहू शेती करून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांचे काय होईल, यावर महसूल विभागानेच चिंतन करण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.