शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

महसूल विभागाच्या आडकाठीत पहाडावर हरितक्रांतीचे स्वप्न भंगले !

By admin | Updated: May 16, 2016 00:57 IST

पहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी.

२ कोटी १३ लाखांचा दंड : ठेकेदाराने केले काम बंदशंकर चव्हाण - जिवतीपहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. त्यातून शेतीच्या उत्पन्नात भर पडेल व आर्थिक स्थिती सुधारेल, या हेतूने जिवती येथे लघुसिंचन विभागाकडून तलावाचे काम मंजूर झाले. काम जोमात असतानाच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंचन तलावाच्या कामावर भेट देवून संबंधित कंत्राटदारावर २ कोटी १३ लाखाचा दंड ठोठावल्याने तलावाचे काम बंद करून कंत्राटदार निघून गेला. परिणामी पहाडावर हरितक्रांती निर्माण होण्याचे स्वप्न भंगले आहे.वर्षानुवर्षे पावसाचा अनियमितपणा व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात बरीच घट झाली आहे. पहाडावर ९० टक्के शेतकरी असून कोरडवाहू शेतीच्या उत्पन्नावरच आपल्या संसाराचा गाडा चालवितात. जवळपास सिंचनाची सोय नसल्याने लवकरच शेतीची कामे आटोपली जातात. त्यानंतर रोजीरोटी कमविण्यासाठी इतरत्र वणवण भटकण्याची वेळ वर्षानुवर्षे बघायला मिळते.जिवतीत लघुसिंचाई विभागाकडून सिंचन तलावाचे काम मंजूर झाल्याने जिवती, देवलागुडा, लोलडोहसह परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सिंचन व्यवस्थेवर आधारित शेती करण्याचे स्वप्न बघत होते पण दुष्काळात तेरावा महिना, या उक्तीप्रमाणे त्यात महसूल विभागाची आडकाठी आली अन् काम बंद पडले. हरित क्रांतीचे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगणार की काय असा प्रश्नही आता शेतकऱ्यांना पडला आहे. महसूल विभागाने कारवाई केली. सिंचन तलावाचे काम बंद पडले. आता पुढे काय, कोरडवाहू शेती करून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांचे काय होईल, यावर महसूल विभागानेच चिंतन करण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.