शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

दोन वर्षात ५.६० कोटींचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:37 IST

येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.

ठळक मुद्देराजुरा तहसीलदारांची कारवाई : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी दंड

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.मागील काही महिन्यांपासून रेती घाटाचे लिलाव रखडले आहे. त्यापूर्वीपासून राजुरा तालुक्यात नदी व नाल्यांमधून रेती चोरी इतरही गौण खनिज चोरीचे प्रकार सर्रास घडत होते. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात होता. दरम्यान, राजुराच्या तहसीलदारांनी अवैध रेती व इतर गौण खनिजाच्या चोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली. ही पथके रात्रदिवस नदी, नाले व खाणींच्या परिसरात नजर ठेवून असतात. भरारी पथकाद्वारे अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात असून, तपासणी अंती वाहतूक परवाना बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहन सोडले जाते.मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी रेतीघाटांच्या लिलावाची मुदत संपली होती. त्यानंतरही काही वाहतूकदारांकडून रात्रीच्या सुमारास चोरीच्या मार्गाने रेती आणली जात असताना तहसील कार्यालयाच्या पथकाने अशा अनेक वाहनांवर दंड ठोठावून कारवाई केली आहे.सध्या जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली असली तरी सर्वच घाटांचा लिलाव अजूनही झालेला नाही. त्यामुळे काही तस्कर नदी व नाल्यांमधील रेतीची तस्करी करीत आहेत. परंतु, राजुरा तालुक्यात सुरु असलेल्या धडक कारवाईमुळे त्यांच्यावर वचक बसला आहे.विरुर स्टेशन परिसरात सर्वात जास्त कारवायाराजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) या भागातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक केली जात असल्याने तहसीलदार होळी व त्यांनी गठित केलेल्या पथकाकडून या भागाकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. विरुर स्टेशन हा परिसर महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेलगत असल्याने व या परिसरात नदी-नाले असल्याने मोठ्या प्रमाणात गौणखनिज या भागात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त कारवाया या भागातच करण्यात आल्या आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईचे सत्र सुरु केल्यामुळेच रेती व इतर गौणखनिजाच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.