शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

दोन वर्षात ५.६० कोटींचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:37 IST

येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.

ठळक मुद्देराजुरा तहसीलदारांची कारवाई : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी दंड

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.मागील काही महिन्यांपासून रेती घाटाचे लिलाव रखडले आहे. त्यापूर्वीपासून राजुरा तालुक्यात नदी व नाल्यांमधून रेती चोरी इतरही गौण खनिज चोरीचे प्रकार सर्रास घडत होते. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात होता. दरम्यान, राजुराच्या तहसीलदारांनी अवैध रेती व इतर गौण खनिजाच्या चोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली. ही पथके रात्रदिवस नदी, नाले व खाणींच्या परिसरात नजर ठेवून असतात. भरारी पथकाद्वारे अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात असून, तपासणी अंती वाहतूक परवाना बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहन सोडले जाते.मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी रेतीघाटांच्या लिलावाची मुदत संपली होती. त्यानंतरही काही वाहतूकदारांकडून रात्रीच्या सुमारास चोरीच्या मार्गाने रेती आणली जात असताना तहसील कार्यालयाच्या पथकाने अशा अनेक वाहनांवर दंड ठोठावून कारवाई केली आहे.सध्या जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली असली तरी सर्वच घाटांचा लिलाव अजूनही झालेला नाही. त्यामुळे काही तस्कर नदी व नाल्यांमधील रेतीची तस्करी करीत आहेत. परंतु, राजुरा तालुक्यात सुरु असलेल्या धडक कारवाईमुळे त्यांच्यावर वचक बसला आहे.विरुर स्टेशन परिसरात सर्वात जास्त कारवायाराजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) या भागातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक केली जात असल्याने तहसीलदार होळी व त्यांनी गठित केलेल्या पथकाकडून या भागाकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. विरुर स्टेशन हा परिसर महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेलगत असल्याने व या परिसरात नदी-नाले असल्याने मोठ्या प्रमाणात गौणखनिज या भागात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त कारवाया या भागातच करण्यात आल्या आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईचे सत्र सुरु केल्यामुळेच रेती व इतर गौणखनिजाच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.