शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

परतलेल्या तरुणांची शेतीवर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. एकीकडे रोजगार नाही अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत आहे.

ठळक मुद्देबेरोजगारीवर मात : शहरातील तरुणांचे लक्ष आता शेती व्यवसायाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शहरातील तरुण गावाकडे परतत आहे. हाताला काम नसल्याने यातील अनेक जण शेतीकडे वळत असून आता गावात शेतीवरच त्यांची भिस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. एकीकडे रोजगार नाही अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरातील अनेक तरुण आपल्या कुटुंबासह पुन्हा गावाकडे परत येत आहेत. मात्र, त्यांना तूर्त गावाकडे येण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने ही कुटुंबे शहरात अडकली आहे.कोरानामुळे सर्वत्र आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्याचा विपरीत फटका ग्रामीण भागालाही बसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मागणी नसल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यातच मोठ्या संख्येने तरुणांचे लोंढे आता ग्रामीण भागात जात आहे. जगण्यासाठी किमान आवश्यक सुविधा तरी गावातच मिळेल, अशी आशा या तरुणांना आहे.मागील काही दिवसात शेतीची चांगली अवस्था नाही. मात्र भविष्यात शेतीचे चांगले दिवस येथील या आशेवर अनेक तरुणांनी आता पुन्हा शेतीकडे आपले लक्ष केंद्रीत करीत आहेत.शहरातून आलेल्या काही तरुणांनी आधुनिक शेतीची कास धरुन शेतीपूरक व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. छोटे-छोटे कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. कोरोनानिमित्ताने का होईना पण शेतीला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील, असा विश्वास ग्रामीण भागातील शेतकºयांना आहे.शेतीला येतील चांगले दिवसकोरोनाते मोछे संकट असले तरी शेतीला पुन्हा चांगले दिवस येण्याची चिन्ह ग्रामीण नागरिकांनी आहे. घरातील तरुण नोकरीनिमित्ताने पुणे, मुंबईसारख्या शहरात गेले. त्यामुळे शेती करण्यासाठी घरातही माणसे नाहीत आणि मजुरही मिळत नाही, अशी अवस्था आहे. परंतु आता शहरातील गेलेल्या तरुणांनी शेतीच उत्तम असल्याचे मान्य केले आहे, तर व्यापार दुय्यम आणि नोकरी कनिष्ठ ठरवत आहे. त्यामुळे पूर्वीचे सूत्र पुन्हा लागू होणार आहे.गाव खेड्याला कायम दुय्यम समजणारी मंडळी कोरोनाचा धसका घेऊन आपला गाव बरा म्हणू लागली आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव शहरी भागात झपाट्याने वाढत असल्यामुळे नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने शहरात वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी आता गावाकडचा रस्ता धरला आहे. शहरातील माणसांचा ग्रामीण भागात वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाची भीती बळावत आहे. स्थानिक प्रशासनासह वैद्यकीय विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहे.

टॅग्स :agricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्या