शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

रासायनिक व विषारी फवारणीमुळे रबी पिकांवर परिणाम

By admin | Updated: February 10, 2017 00:57 IST

पिकावरील रोगराईचा नाश व भरघोस उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध

उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयत्न : शेणखताचा वापर करण्याचे आवाहनचंद्रपूर : पिकावरील रोगराईचा नाश व भरघोस उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या किटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळत आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणात औषधांचा वापर करावा. तसेच पीक पद्धतीत बदल करावा, अशी चर्चा प्रगतीशील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल. मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरश: विषाची फवारणी केली जात आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेती धोक्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. नवनवीन वाण बाजारात उपलब्ध असून यासोबतच किटकनाशकांचीही मागणी वाढली आहे. शेतात उत्पादन होणाऱ्या धानपीक, भाजीपाला आदी पिकांवर विभागाकडून व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपिकांचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र वर्षोनुवर्षे आजोबा- पंजोबामधून कसत असलेल्या जमिनीची परंपरा आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये दिसून येत आहे. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, असेही मत व्यक्त केले जात आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. भरघोष उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, सोबतच किडीवर फवारणी प्रमाणात करावी, असेही मत सुज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. रासायनिक खतामुळे मानवी जीवनावर दुष्पपरिणाम होत असल्याचे लक्षात घेत पोत सुधारण्यासाठी शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)