शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

रासायनिक व विषारी फवारणीमुळे रबी पिकांवर परिणाम

By admin | Updated: February 10, 2017 00:57 IST

पिकावरील रोगराईचा नाश व भरघोस उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध

उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयत्न : शेणखताचा वापर करण्याचे आवाहनचंद्रपूर : पिकावरील रोगराईचा नाश व भरघोस उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या किटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळत आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणात औषधांचा वापर करावा. तसेच पीक पद्धतीत बदल करावा, अशी चर्चा प्रगतीशील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल. मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरश: विषाची फवारणी केली जात आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेती धोक्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. नवनवीन वाण बाजारात उपलब्ध असून यासोबतच किटकनाशकांचीही मागणी वाढली आहे. शेतात उत्पादन होणाऱ्या धानपीक, भाजीपाला आदी पिकांवर विभागाकडून व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपिकांचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र वर्षोनुवर्षे आजोबा- पंजोबामधून कसत असलेल्या जमिनीची परंपरा आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये दिसून येत आहे. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, असेही मत व्यक्त केले जात आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. भरघोष उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, सोबतच किडीवर फवारणी प्रमाणात करावी, असेही मत सुज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. रासायनिक खतामुळे मानवी जीवनावर दुष्पपरिणाम होत असल्याचे लक्षात घेत पोत सुधारण्यासाठी शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)