शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

टॉवर उभारणीस शेतकºयांचा मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:51 IST

नागरी येथे पॉवर ग्रीडच्या वतीने वीज उपकेंद्राची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकºयांकडून जमीन ताब्यात घेण्यापूर्वी करारनामा करणे गरजेचे होते.

ठळक मुद्देशेतीचे नुकसान : पॉवर ग्रीडच्या अधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: नागरी येथे पॉवर ग्रीडच्या वतीने वीज उपकेंद्राची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकºयांकडून जमीन ताब्यात घेण्यापूर्वी करारनामा करणे गरजेचे होते. मात्र काही शेतकºयांशी केलेला करार बाजूला ठेवून संबंधित अधिकाºयांनी थेट बांधकाम सुरू केल्याने शेतकºयांनी शनिवारी मज्जाव केल्याची घटना घडली. करारनामानुसार मोबदला मिळाला नाही तर बांधकाम कायस्वरुपी बंद करून पॉवर ग्रीड कर्पोरेशनच्या अधिकाºयांना धडा शिकवू, असा इशाराही शेतकºयांनी दिला आहे.वर्धा ते नागरी ४०० केवी विज तारा टाकण्याचे काम पावर ग्रीडने सुरू केले. याशिवाय नागरी ते परडी पर्यंतही वीजतारा टाकण्यात येणार आहे. वरोरा, चिमूर तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे या टॉवरमुळे नुकसान होणार आहे. टॉवरची उभारणी शेतात केली जात असून शेतकºयांनी विरोध केल्यास पोलिसांच्या माध्यमाने बळाचा वापर केला जातो. हा प्रकार मागील काही दिवसापासून सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात शेतकºयांनी वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला. मात्र कुणीही दखल घ्यायला तयार नाही. वर्धा ते नागरी या मार्गावर टॉवर लाईन उभारताना शेतकºयांची बाजू समजून घेण्यात आली नाही. शिवाय, मोबदला दण्याबाबत कोणताही तोडगा काढला नाही. परंतु टॉवर उभारणीचे काम सुरू करून शेतकºयांवर अन्याय केला जात आहे. दरम्यान आज शेतकºयांनी घटना स्थळावर जाऊन अधिकाºयांना धारेवर धरले आणि टॉवर उभारणीचे काम बंद केले आहे. आर्थिक मोबदल्याचा कारनामा न करताना नियमांचे उल्लंघन करून मनमानी करणे नाही. यातून पून्हा असंतोष पसरू शकतो. त्यामुळे सामंज्यशाने चर्चा करून अन्याय दूर करावी, अशी मागणी शेतकºयांनी निवेदनातून केलीे आहे.अन्यायग्रस्त शेतकºयांची सोमवारी बैठकअन्यायग्रस्त शेतकºयांनी टॉवर उभारणीला विरोध दर्शवल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालयात पॉवर ग्रीडचे अधिकारी, कृषी भूमीअभिलेख विभागाचे अधिकारी आणि शेतकºयांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.पोलीस बळाचा वापर करू नकाशेतकºयांनी विकासाला कधीही विरोध केला नाही. मात्र त्यांच्यावर अन्याय करून चुकीची धोरणे पुढे रेटणे बंद करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. करारनामा करण्यापूर्वी शेतात काम सुरू झाल्याने शेतकºयांनी जाब विचारला. दरम्यान पण, बाजू ऐकून न घेता काही अधिकारी पोलिसी बळाचा धाक दाखवतात, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.