शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर उभारणीस शेतकºयांचा मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:51 IST

नागरी येथे पॉवर ग्रीडच्या वतीने वीज उपकेंद्राची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकºयांकडून जमीन ताब्यात घेण्यापूर्वी करारनामा करणे गरजेचे होते.

ठळक मुद्देशेतीचे नुकसान : पॉवर ग्रीडच्या अधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: नागरी येथे पॉवर ग्रीडच्या वतीने वीज उपकेंद्राची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकºयांकडून जमीन ताब्यात घेण्यापूर्वी करारनामा करणे गरजेचे होते. मात्र काही शेतकºयांशी केलेला करार बाजूला ठेवून संबंधित अधिकाºयांनी थेट बांधकाम सुरू केल्याने शेतकºयांनी शनिवारी मज्जाव केल्याची घटना घडली. करारनामानुसार मोबदला मिळाला नाही तर बांधकाम कायस्वरुपी बंद करून पॉवर ग्रीड कर्पोरेशनच्या अधिकाºयांना धडा शिकवू, असा इशाराही शेतकºयांनी दिला आहे.वर्धा ते नागरी ४०० केवी विज तारा टाकण्याचे काम पावर ग्रीडने सुरू केले. याशिवाय नागरी ते परडी पर्यंतही वीजतारा टाकण्यात येणार आहे. वरोरा, चिमूर तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे या टॉवरमुळे नुकसान होणार आहे. टॉवरची उभारणी शेतात केली जात असून शेतकºयांनी विरोध केल्यास पोलिसांच्या माध्यमाने बळाचा वापर केला जातो. हा प्रकार मागील काही दिवसापासून सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात शेतकºयांनी वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला. मात्र कुणीही दखल घ्यायला तयार नाही. वर्धा ते नागरी या मार्गावर टॉवर लाईन उभारताना शेतकºयांची बाजू समजून घेण्यात आली नाही. शिवाय, मोबदला दण्याबाबत कोणताही तोडगा काढला नाही. परंतु टॉवर उभारणीचे काम सुरू करून शेतकºयांवर अन्याय केला जात आहे. दरम्यान आज शेतकºयांनी घटना स्थळावर जाऊन अधिकाºयांना धारेवर धरले आणि टॉवर उभारणीचे काम बंद केले आहे. आर्थिक मोबदल्याचा कारनामा न करताना नियमांचे उल्लंघन करून मनमानी करणे नाही. यातून पून्हा असंतोष पसरू शकतो. त्यामुळे सामंज्यशाने चर्चा करून अन्याय दूर करावी, अशी मागणी शेतकºयांनी निवेदनातून केलीे आहे.अन्यायग्रस्त शेतकºयांची सोमवारी बैठकअन्यायग्रस्त शेतकºयांनी टॉवर उभारणीला विरोध दर्शवल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालयात पॉवर ग्रीडचे अधिकारी, कृषी भूमीअभिलेख विभागाचे अधिकारी आणि शेतकºयांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.पोलीस बळाचा वापर करू नकाशेतकºयांनी विकासाला कधीही विरोध केला नाही. मात्र त्यांच्यावर अन्याय करून चुकीची धोरणे पुढे रेटणे बंद करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. करारनामा करण्यापूर्वी शेतात काम सुरू झाल्याने शेतकºयांनी जाब विचारला. दरम्यान पण, बाजू ऐकून न घेता काही अधिकारी पोलिसी बळाचा धाक दाखवतात, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.