शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू

By admin | Updated: July 8, 2015 01:20 IST

शेतपिकाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढले त्यामुळे शेतकरी नैराश्याचे जीवन जगत असून त्यांना आधार देण्याची गरज आहे.

सुदर्शन निमकर यांचा इशारा : राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या सादरराजुरा : शेतपिकाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढले त्यामुळे शेतकरी नैराश्याचे जीवन जगत असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. मात्र शासन केवळ पोकळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण करीत असून शासनाने शेतकरी, शेतमजूर व युवक बेरोजगारांच्या समस्या लवकर मार्गी काढाव्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिला. राजुरा येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यातील ज्वलंत समस्या संदर्भात व आगामी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर पालिका गटनेते शरीफभाई सिद्धीकी, नंदकिशोर वाढई, तालुका अध्यक्ष हरिदास झाडे, युवक तालुका अध्यक्ष रामभाऊ देवईकर, महिला अध्यक्ष लता ठाकरे, नगरसेविका पुष्पा कोडापे, माया रोगे, आदित्य भाके, शहर युवक अध्यक्ष नितीन बांभ्रटकर, रेणुका सावरकर, भावना ताठे, शुभांगी पिंपळकर, शारदा मोहितकर, उषा करमनकर यांची मंचावर उपस्थिती होती.सभेमध्ये राजुरा तालुक्यातील प्रमुख समस्यांपैकी भूमी अधिग्रहण कायदा लागू करण्यात येऊ नये, निम्न पैनगंगा प्रकल्पाचा लाभ क्षेत्रातील जमिनीची खरेदी विक्रीवरील बंदी उठविण्यात यावी, खरीपामध्ये तालुक्यातील ५४ गावे समाविष्ठ करण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, विहिरगाव येथे वीज वितरणच्या सबस्टेशनचे काम सुरू करण्यात यावे, पेसा कायद्यामध्ये सुधारणा करुन मच्छीमार संस्थाना तलाव तडजोडीने देण्यात यावे, बेरडी गावाचे पूर्नवसन करुन भेंडाळा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावे, सेतु केंद्रातून सात-बारा उतारा देण्यात यावा, ई- फेरफर कार्यालयात सुद्धा करण्यात यावी इत्यादी समस्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्ता सभेनंतर पाचशे शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवक कार्यकर्त्यासह गांधी चौक, जुना बसस्टॅन्ड मार्गे समस्या सोडविण्याकरीता शासन विरोधी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकले. उपविभागीय अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देऊन समस्या न सोडविल्यास शेतकरी, शेतमजूर, युवक यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा दिला. (शहर प्रतिनिधी)