शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:31 IST

काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर महानगरातील भानापेठ प्रभागातील पीएच नगर परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व नालीचे बांधकामाच्या भूमिपूजन व भानापेठ मधील माता मंदिर परिसरातील अन्य एका रस्त्याचे भूमीपूजन केल्यानंतर ते नागरिकांशी संवाद साधत होते. व्यासपीठावर आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, नगरसेवक संजय कंचर्लावार, आशा आबुजवार, राजीव अडपेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, शितल कुळमेथे आदी उपस्थित होते.भानापेठ परिसरातील पीएच नगरात ११० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. तसेच या ठिकाणी २०० चौरस मीटर परिसरात एका बगीच्याचे देखील सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ५० लाख रुपयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच भानापेठ क्रमांक ११ मधीलच माता मंदिर परिसरातील भूमीगत नाली व रस्त्याचे ३० लाख रुपयांचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी उर्वरित कामांसाठी निवेदने दिलीत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. त्यानंतर बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या मिशनची माहिती दिली. आपल्या वार्डातील व परिसरात गरिबी रेषेच्या खाली येणाऱ्या नागरिकांसाठी दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य उपलब्ध करणारे मिशन दिनदयाल सुरू करण्यात आले आहे. जे गरीब असतील त्या सर्वांना यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. अशा सर्व नागरिकांची माहिती गोळा करणे नगरसेवकाला माहिती देणे या कामातही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन सेवा, मिशन शक्ती सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मिशन मंथनच्या माध्यमातून १०० आदिवासी युवकांना उद्योजक बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेची कामे पूर्ण केल्यानंतर रस्ते करावेत, अशी सूचना महापौर घोटेकर यांना दिल्या. संचालन उमा कुकुडवाड यांनी केले.