शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:31 IST

काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर महानगरातील भानापेठ प्रभागातील पीएच नगर परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व नालीचे बांधकामाच्या भूमिपूजन व भानापेठ मधील माता मंदिर परिसरातील अन्य एका रस्त्याचे भूमीपूजन केल्यानंतर ते नागरिकांशी संवाद साधत होते. व्यासपीठावर आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, नगरसेवक संजय कंचर्लावार, आशा आबुजवार, राजीव अडपेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, शितल कुळमेथे आदी उपस्थित होते.भानापेठ परिसरातील पीएच नगरात ११० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. तसेच या ठिकाणी २०० चौरस मीटर परिसरात एका बगीच्याचे देखील सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ५० लाख रुपयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच भानापेठ क्रमांक ११ मधीलच माता मंदिर परिसरातील भूमीगत नाली व रस्त्याचे ३० लाख रुपयांचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी उर्वरित कामांसाठी निवेदने दिलीत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. त्यानंतर बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या मिशनची माहिती दिली. आपल्या वार्डातील व परिसरात गरिबी रेषेच्या खाली येणाऱ्या नागरिकांसाठी दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य उपलब्ध करणारे मिशन दिनदयाल सुरू करण्यात आले आहे. जे गरीब असतील त्या सर्वांना यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. अशा सर्व नागरिकांची माहिती गोळा करणे नगरसेवकाला माहिती देणे या कामातही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन सेवा, मिशन शक्ती सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मिशन मंथनच्या माध्यमातून १०० आदिवासी युवकांना उद्योजक बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेची कामे पूर्ण केल्यानंतर रस्ते करावेत, अशी सूचना महापौर घोटेकर यांना दिल्या. संचालन उमा कुकुडवाड यांनी केले.