शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

सिंदेवाही तालुक्यात एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:03 IST

राज्यात १ ते ३१ जुलै या कालवधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोणातून तालुक्याला १ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वनविभागातर्फे तयारी करण्यात येत असून खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवनविभागातर्फे जय्यत तयारी : खड्डे खोदण्याच्या कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : राज्यात १ ते ३१ जुलै या कालवधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोणातून तालुक्याला १ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वनविभागातर्फे तयारी करण्यात येत असून खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड अभियानात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबत खासगी संस्था वृक्षारोपण करणार आहेत. त्यामध्ये सिंदेवाही नगर पंचायत १० हजार, वनविभाग १६ हजार, समाजिक वनिकरण २० हजार, पंचायत समिती १० हजार, तालुक्यातील इतर ग्रामपंचायत ३० हजार, कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार, तहसील कार्यालय पाच हजार यांच्यासह विविध सामाजिक संघटना एकूण एक लाख ३० हजारांच्यावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. वृक्षलागवडीसंदर्भात मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता सिंदेवाही वनविभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीसंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात शासकीय कार्यालयामार्फत बैठकी घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी वृक्षारोपणाचे कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. एकंदरीत वनविभागामार्फत वृक्षलागवडीची जय्यत तयारी करण्यात येत आहे.बल्लारपूर नगरपालिका लावणार २० हजार वृक्षबल्लारपूर : राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत बल्लारपूर शहरात नगर परिषदेकडून २० हजार झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये नुतन बालकाचे आगमनाप्रित्यर्थ जन्मवृक्ष, नवविवाहित वधूवरांना शुभ आशीर्वाद म्हणून शुभमंगल वृक्ष, दहावी, बारावी आणि इतर परीक्षा उत्तीर्ण होणाºया तसेच नुकतीच नोकरी लागलेल्या तरुण तरुणींच्या हस्ते आनंद वृक्ष, घरातील निधन झालेल्या व्यक्तींच्या आठवणीत स्मृती वृक्ष तसेच घरगुती वृक्ष याप्रकारे शहराच्या विविध भागात वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. वृक्ष लागवडीनंतर त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारीसुद्धा संबंधित व्यक्तींना घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर नगर परिषदेने दिवंगत नगराध्यक्षाच्या स्मृतीत प्रत्येकी पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. सदर वृक्ष लागवडीमध्ये रोडच्या दोन्ही बाजूंना पाच हजार वृक्ष तर खुल्या मैदानावर १५ हजार वृक्ष लावण्यात येणार आहे. वृक्षलगवडीच्या योजनेसाठी नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा तसेच नगरपालिकेचे सर्व नगरसेवक प्रयत्नरत आहेत.