शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी पंचायत समितीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:26 IST

जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देबहुमताने मंजूर : पं. स. च्या सर्व सदस्यांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.उपसभापती विलास उरकुडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी जिल्हा शासनाने घोषित करावा, असा ठराव सभागृहात मांडला या ठरावाला गटनेते रामलाल दोनाडकर यांनी अनुमोदन दिले. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाच्या नऊ सदस्यांनी पाठिंबा देऊन हा ठराव सभागृहात बहुमताने संमत केला. यासंदर्भात माहिती देताना उपसभापती उरकुडे म्हणाले, ब्रम्हपुरी हे शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. लोकसंख्या, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सोयी सुविधा, विविध विभागांची शासकीय कार्यालये उपलब्ध आहेत. जिल्ह्याचे विभाजन करताना शासनाने प्रामुख्याने ब्रम्हपुरी शहराचाच आधी विचार करावा, यासाठी हा ठराव घेण्यात आला. गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या आधीपासूनच ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी सुरू झाली होती. परंतु याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे , असेही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.शासनाने जिल्ह्याचे विभाजन करताना सर्वप्रथम ब्रम्हपुरीचा विचार करावा. ब्रम्हपुरी हे ठिकाण चंद्रपूरपासून १२५ किमी लांब आहे. तालुक्यातील जनतेला शासकीय कामासंदर्भात ये-जा करताना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ब्रम्हपुरी शहर आणि परिसराचा अद्याप विकास झाला नाही.नवीन जिल्हा निर्मिती झाल्यास विकासाला चालना मिळेल. जिल्हास्थळाच्या दृष्टीने पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचायत समितीने यासंदर्भात बहुमताने ठराव पारित करण्यात आला. शासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या ब्रम्हपुरीला जिल्ह्याचा दर्जा प्रदान करावा, यावर उपस्थित सदस्यांनी पं. स. सभागृहात समर्थनार्थ ठाम भूमिका मांडल्याने मागणीला चळवळीचे स्वरूप येऊ शकते.शासनाला ठराव पाठविणारराज्य सरकारने जिल्हा निर्मितीसंदर्भात हालचाली सुरू केल्याचे वृत्त माध्यमातून पसरले आहे. परंतु, मागील अनेक वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी जनजागृती मोहीम राबविले जात आहे. या मागणीला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असून विविध सामाजिक संघटनादेखील प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. या परिसराच्या विकास अनुशेष अद्याप पूर्ण झाला नाही. अनेक कामे रेंगाळली आहेत. जिल्हा झाल्यास विकासाला गती येईल. तसेच नागरिकांच्या समस्या दूर होतील. पंचायत समितीच्या वतीने हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.