शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी पंचायत समितीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:26 IST

जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देबहुमताने मंजूर : पं. स. च्या सर्व सदस्यांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात राज्य शासन विचार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पंचायत समितीने ठराव पारित केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.उपसभापती विलास उरकुडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी जिल्हा शासनाने घोषित करावा, असा ठराव सभागृहात मांडला या ठरावाला गटनेते रामलाल दोनाडकर यांनी अनुमोदन दिले. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाच्या नऊ सदस्यांनी पाठिंबा देऊन हा ठराव सभागृहात बहुमताने संमत केला. यासंदर्भात माहिती देताना उपसभापती उरकुडे म्हणाले, ब्रम्हपुरी हे शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. लोकसंख्या, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सोयी सुविधा, विविध विभागांची शासकीय कार्यालये उपलब्ध आहेत. जिल्ह्याचे विभाजन करताना शासनाने प्रामुख्याने ब्रम्हपुरी शहराचाच आधी विचार करावा, यासाठी हा ठराव घेण्यात आला. गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या आधीपासूनच ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी सुरू झाली होती. परंतु याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे , असेही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.शासनाने जिल्ह्याचे विभाजन करताना सर्वप्रथम ब्रम्हपुरीचा विचार करावा. ब्रम्हपुरी हे ठिकाण चंद्रपूरपासून १२५ किमी लांब आहे. तालुक्यातील जनतेला शासकीय कामासंदर्भात ये-जा करताना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ब्रम्हपुरी शहर आणि परिसराचा अद्याप विकास झाला नाही.नवीन जिल्हा निर्मिती झाल्यास विकासाला चालना मिळेल. जिल्हास्थळाच्या दृष्टीने पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचायत समितीने यासंदर्भात बहुमताने ठराव पारित करण्यात आला. शासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या ब्रम्हपुरीला जिल्ह्याचा दर्जा प्रदान करावा, यावर उपस्थित सदस्यांनी पं. स. सभागृहात समर्थनार्थ ठाम भूमिका मांडल्याने मागणीला चळवळीचे स्वरूप येऊ शकते.शासनाला ठराव पाठविणारराज्य सरकारने जिल्हा निर्मितीसंदर्भात हालचाली सुरू केल्याचे वृत्त माध्यमातून पसरले आहे. परंतु, मागील अनेक वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी जनजागृती मोहीम राबविले जात आहे. या मागणीला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असून विविध सामाजिक संघटनादेखील प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. या परिसराच्या विकास अनुशेष अद्याप पूर्ण झाला नाही. अनेक कामे रेंगाळली आहेत. जिल्हा झाल्यास विकासाला गती येईल. तसेच नागरिकांच्या समस्या दूर होतील. पंचायत समितीच्या वतीने हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.