शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प

By admin | Updated: December 10, 2014 22:55 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा

बल्लारपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला. पहिल्या टप्प्यात बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प करून विसापूर, चुनाभट्टी, बामणी (दुधोली) व काटवली (बामणी) गावातील लोकांच्या भेटी घेऊन लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे लोकचळवळ निर्माण झाली असून लोकप्रतिनिधी शौचालयासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करीत असल्याचे चित्र आहे.रविवार सुटीचा दिवस असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मजेचा दिवस असतो. मात्र याला फाटा देत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते, कृष्णकांत खानझोडे, संजय धोटे यांचा ताफा पहिल्यांदा विसापूरला धडकला. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, सरपंच बंडू गिरडकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच शाम वैद्य यांच्यासह चर्चा करून प्रस्तावित शौचालय बांधकामाची पाहणी केली. बामणी (दुधोली) येथे सरपंच सुजाता टिपले, माजी सभापती हरिष गेडाम, ग्रामपंचायतीच्या सदस्य सत्यशीला साळवे व निर्मल दूत यांच्या समवेत बैठक घेऊन वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी कोणत्याही स्थितीत लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित न ठेवण्याचे निर्देश संवर्ग विकास अधिकारी गजभे व ग्राम विकास अधिकारी ढुमणे यांना देण्यात आले. काटवली येथे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, माजी उपसभापती सुमन लोहे, सरपंच माधुरी ढुमणे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)