शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प

By admin | Updated: December 10, 2014 22:55 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा

बल्लारपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला. पहिल्या टप्प्यात बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प करून विसापूर, चुनाभट्टी, बामणी (दुधोली) व काटवली (बामणी) गावातील लोकांच्या भेटी घेऊन लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे लोकचळवळ निर्माण झाली असून लोकप्रतिनिधी शौचालयासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करीत असल्याचे चित्र आहे.रविवार सुटीचा दिवस असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मजेचा दिवस असतो. मात्र याला फाटा देत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते, कृष्णकांत खानझोडे, संजय धोटे यांचा ताफा पहिल्यांदा विसापूरला धडकला. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, सरपंच बंडू गिरडकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच शाम वैद्य यांच्यासह चर्चा करून प्रस्तावित शौचालय बांधकामाची पाहणी केली. बामणी (दुधोली) येथे सरपंच सुजाता टिपले, माजी सभापती हरिष गेडाम, ग्रामपंचायतीच्या सदस्य सत्यशीला साळवे व निर्मल दूत यांच्या समवेत बैठक घेऊन वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी कोणत्याही स्थितीत लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित न ठेवण्याचे निर्देश संवर्ग विकास अधिकारी गजभे व ग्राम विकास अधिकारी ढुमणे यांना देण्यात आले. काटवली येथे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, माजी उपसभापती सुमन लोहे, सरपंच माधुरी ढुमणे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)