शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

देशविरोधी शक्तीचा प्रतिकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:39 IST

अभाविपने देशाच्या अखंडतेसाठी खूप कार्य केले, आता पुन्हा एकदा देशविघातक शक्तींशी चारहात करण्याची वेळ आली आहे. अलगाववाद, उग्रवाद, नक्षलवाद आदींचे आवाहन अद्यापही संपलेले नाही.

ठळक मुद्देहंसराज अहीर : अभाविप विदर्भ प्रांत अधिवेशनात विविध विषयांवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अभाविपने देशाच्या अखंडतेसाठी खूप कार्य केले, आता पुन्हा एकदा देशविघातक शक्तींशी चारहात करण्याची वेळ आली आहे. अलगाववाद, उग्रवाद, नक्षलवाद आदींचे आवाहन अद्यापही संपलेले नाही. जेएनयुमध्ये काश्मिरच्या आझादीचे नारे लागतात, हा लांच्छणास्पद विषय आहे. या शक्तींना थांबविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेच. नक्षलवाद १०६ जिल्ह्यातून आता केवळ ३५ जिल्ह्यात शिल्लक राहिला आहे, हा त्याचाच परिणाम आहे. मात्र ही विचारसरणी लपून महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिरू पाहत आहे. त्याचा सामना करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कंबर कसली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ४६ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता चंद्रपूर येथील क्लब ग्राऊंड मैदानावर (शहीद वीर बाबूराव शेडमाके नगरीत) पार पडले. दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ना. हंसराज अहीर बोलत होते.यावेळी मंचावर अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, सहसंघटनमंत्री जी. लक्ष्मण, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. स्वप्निल पोतदार, विदर्भ प्रांत मंत्री विक्रमजित कलाने, स्वागत समिती उपाध्यक्ष राहुल पावडे, सहसचिव सुहास अलमस्त, प्रज्वल गारगेनवार प्रभृती उपस्थित होते.अहीर पुढे म्हणाले, बाबासाहेब देशभक्त होते त्यांनी कधीही हिंसेला थारा दिला नाही. अशा महान व्यक्तीचे नाव अलगाववाद्यांनी घेणे चुकीचे आहे. ते थांबले पाहिजे. देशाला तोडणाऱ्यांचा आवाज दाबून राष्ट्रीय विचार प्रसारित झाले पाहिजे. महाविद्यालयामध्ये देशाचा आवाज बुलंद करण्याचे हे काम अभाविपने करावे. शैक्षणिक क्षेत्रात प्रसार माध्यमांची भूमिका पार पाडावी, अशीही आशाही ना. अहीर यांनी व्यावेळी व्यक्त केली.भन्सालीच्या रानी पद्मावती सिनेमावरही अहीर यांनी ताशेरे ओढले. सेंसार बोर्डापर्यंत जाण्याच्या आतच लोकांनी तीव्र प्रतिक्रिया देऊन त्यांना चोख उत्तर दिल्याचे सांगून हीच आपल्या संस्कृतीची ताकद असल्याचे ते म्हणाले, अभाविपने आहे त्यापेक्षा आपली ताकद अधिक वाढवावी, असेही ते म्हणाले.तर अगदी पहिल्या दिवसापासून अभाविप विदर्भात रूजले आहे. अनेकांच्या महत प्रयत्नांनी परिषदेचे काम सातत्याने चालू आहे. हे काम अधिक गतीने पुढे जावे, ही जबाबदारी आपल्या पिढीची आहे. तरुण विद्यार्थी हा ‘न्यूसेन्स पॉवर’ नाही, तर ‘नेशन्स पॉवर’ आहे. हे अभाविपने सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित या संघटनेकडून देशाला मोठी अपेक्षा आहे, असे सुनील आंबेकर म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्निल पोतदार यांनी केले. संचालन अभाविपने शाखाध्यक्ष प्रा. योगेश येनारकर तर आभार सुहास अलमस्त यांनी केले.विद्यार्थी संघटनेचे हेच सूत्रअखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे देशातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे. यंदा ३० लाख सदस्यता झाली, हा तसा गौण विषय आहे. अशी आजवरची सदस्यता किती मोठी असेल याची कल्पनाही करता येत नाही, असे मत प्रमुख भाषणात जी. लक्ष्मण यांनी व्यक्त केले.