शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

आरक्षणाला धक्का लावता कामा नये

By admin | Updated: August 24, 2014 23:24 IST

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावता कामा नये, असा इशारा गोंडवाना टायगर्स या संघटनेने राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

चंद्रपूर : आदिवासींच्या आरक्षणाला हात लावता कामा नये, असा इशारा गोंडवाना टायगर्स या संघटनेने राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.सत्ताधारी महाराष्ट्र शासन व सत्तेतील काही मोठी मंडळी आदिवासींच्या जिवावर उठले आहेत. धनगर व अन्य ५० जातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी हस्तक्षेप सुरु आहे. आपल्या राजकीय महत्वकांक्षेच्या पूर्तीकरिता गुण्या गोविंदाने खेड्यापाड्यात, गावागावांत पिढ्यान्पिढ्या राहत असलेल्या जाती-जातीमध्ये, संघर्षाची पार्श्वभूमी तयार केल्या जात आहे. शासनाच्या या षडयंत्राचा गोंडवाना टायगर्सच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. राज्यपालांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून गोंडवाना टायगर्सने या विषयावर आपली भूमिका जाहीर केलेली आहे.संविधानाच्या तरतुदी नुसार अनुसूचित जमाती व जनजाती प्रवर्गास ७.५० टक्के संविधानात्मक आरक्षण बहाल करण्यात आले. परंतु १९५१ ते १९७६ पर्यंत क्षेत्र बंधनामुळे संपूर्ण समाजाला आरक्षण प्राप्त झाले नाही. सामाजिक आंदोलनामुळे १९७६ साली क्षेत्रबंधन हटविण्यात येऊन, राज्यस्तरावर अनुसूचित जमातीची यादी तयार करण्यात आली व १९७६ नंतर संपूर्ण आदिवासी जमातीला आरक्षणाचे संविधानात्मक अधिकार प्रदान करण्यात आले. या अनुषंगाने विचार केल्या आरक्षणाच्या सोई-सवलतींपासून हा समाज २५ वर्षे दूर राहीला आहे. आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोणताही बदल न करता शासनाने निर्णय घ्यावा. अनुसूचित जमातीच्या यादीतून बोगस आदिवासी जातींना वगळण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गोंडवाना टायगर्सचे संयोजक प्रविण आडेकर, अध्यक्ष श्रीकांत नैताम, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धीर शेडमाके, मनोज आत्राम, दिलीप किन्नाके, नीळकंठ परचाके, घनश्याम सुरपाम, राजा आडेकर, पांडुरंग जुमनाके यांच्यासह गोंडवाना टायर्गस या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)