शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाचे आयुष्य बदलविणारा संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:25 IST

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथांवर मात करण्यासाठी दादाजी खोब्रागडे यांनी विद्यापीठीय संशोधकांना लाजवेल, अशा पद्धतीचे मूलगामी संशोधन कृषी क्षेत्रात केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसरात्र संशोधनात मग्न राहून भातशेतीचे कृषिविज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेणाऱ्या शेतीनिष्ठ संशोधकाच्या निधनाने कृषी संशोधन व विस्तार कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.नागभीड तालुक्यातील नांदेड ...

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथांवर मात करण्यासाठी दादाजी खोब्रागडे यांनी विद्यापीठीय संशोधकांना लाजवेल, अशा पद्धतीचे मूलगामी संशोधन कृषी क्षेत्रात केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसरात्र संशोधनात मग्न राहून भातशेतीचे कृषिविज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेणाऱ्या शेतीनिष्ठ संशोधकाच्या निधनाने कृषी संशोधन व विस्तार कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.नागभीड तालुक्यातील नांदेड येथे अल्पभूधारक शेतकरी म्हणून सुरुवातीला पारंपारिक शेती करीत होते. दादाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी तीन एकर भाताची शेती विकली होती. सुनेच्या वडिलांनी दिलेल्या दीड एकर शेतीवर घरातल्या सहा जणांचा चरितार्थ चालत होता. घर चालविण्याबरोबरच नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी दादाजी आपली शेती सांभाळून दुसºयांच्या शेतीवर मजुरी करू लागले. १९८३ ला दादाजींनी शेतात पहिल्यांदा ‘पटेल’ या जातीच्या धानाची लागवड केली. पिकांचे सूक्ष्म निरीक्षण करताना त्यांना धानाच्या तीन रोपांच्या पांढऱ्या लोंबीवर पिवळे ठिपके दिसले. तीन रोपांचे बी वेगळे काढून पुढील हंगामात त्याच बियांची पेरणी केली. हे धानाचे पीक आवडल्याने दादाजींनी त्याचेच पुढे बीजगुणन सुरू ठेवले. परिसरातील शेतकऱ्यांना आवडल्याने मागणी वाढली. हेच वाण पुढे लोकप्रिय ‘एचएमटी सोना’ या नावाने शेतकऱ्यांची मने जिंकली. मातीत राबवूनही शेतकºयांच्या हातात फारसे उत्पन्न येत नसल्याचे पाहून भात शेतीच्या समस्यांच्या मूळाशी गेले आणि उपाययोजना शोधली. परिसरातील शेतकºयांशी संवाद साधून शेतीचे निरीक्षण करण्याची त्यांच्याकडे विलक्षण हातोटी होती. त्यामुळे पर्यावरणाच्या सर्व बदलांचा आमूलाग्र अभ्यास करून भाताचे नवीन वाण विकसित केले. हा प्रयोग स्वत:च्या शेतीतूनच सुरुवात केला होता. भाताचे एचएमटी वाण हे दादाजी खोब्रागडे यांच्या प्रचंड परिश्रमाचे प्रतीक आहे. या संशोधनामुळे दादाजी खोब्रागडे यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही गौरव केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘फोर्ब्स’ ने दादाजींच्या संशोधनाची दखल घेतली. परंतु, आयुष्याच्या उत्तरार्धात दादाजींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान माध्यमांनी दादाजींची व्यथा मांडल्यानंतर राज्य सरकारने दोन लाखांची मदत केली होती. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आर्थिक मदत करून कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जीवनातील दाहकता सोसून शेतीतच संशोधन करणाऱ्या दादाजींच्या निधनाने समग्र कष्टकरी समुदायांमध्येच शोककळा आहे.