शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

तहसीलदारांना निवेदन: युवा विद्यार्थी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:09 IST

मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेसला ऐतिहासीक वारसा लाभला आहे.

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा बल्लारपूर : मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेसला ऐतिहासीक वारसा लाभला आहे. शासनाची जबाबदारी ऐतिहासीक स्थळाचे जतन करण्याची आहे. मात्र मनमानी कारभार करुन काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्यावर बुलडोजर चालवून पाडण्यात आले. यामुळे आंबेडकरी समाज दुखावला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बल्लारपूर येथील डॉ. आंबेडकर अवेकन युथ विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार विकास अहीर यांना मंगळवारला दिलेल्या निवेदनातून केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती जगभर साजरी केली जात आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, घटनात्मक मसुदा तयार करण्याचे कार्य दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातून केले. समाजाची जागृती करण्यासाठी बुद्धभूषण प्रेसच्या माध्यमातून कार्य करण्यात आले. मुक समाजाला स्वाभिमानाचे धडे याच वास्तुमधून देण्यात आले. राज्य सरकार राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विश्वस्मारक उभारण्याची घोषणा करीत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या वास्तुची तोडफोड करीत आहे. या विरोधाभासामुळे आंबेडकरांना मानणाऱ्या समाजातील लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बल्लारपूर शहरात उमटले असून विद्यार्थ्यांची संघटना पुढे सरसावली आहे. ऐतिहासीक वारसा जमीनदोस्त करणाऱ्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवेकन युथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली. याचे निवेदन येथील तहसीलदार विकास अहीर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बल्लारपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवेकन युथ विद्यार्थी संघटनेचे निखील सुखदेवे, प्रक्षय मोडक, जया भसारकर, प्रियंका चव्हाण, सोनाली गायकवाड, बादल देशभ्रतार, अर्जुन वैरागडे, कपील ढाले, अंकीत कवाडे, प्रतीक्षा करमनकर, शिंकू ताकसांडे, अंकीता डुंबेरे, दीक्षा मालखेडे, नेहा कोल्हे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)