शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी पत्रकार संघातर्फे निवेदन

By admin | Updated: August 28, 2015 01:24 IST

महाराष्ट्रात नविन २२ जिल्हे नव्याने निर्माण केले जाणार आहेत. तसे प्रस्ताव शासनस्तरावर मागविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वर्तमानपत्रातून निदर्शनास आले होते.

कृती समितीचीही स्थापना : हालचालींना वेगब्रह्मपुरी : महाराष्ट्रात नविन २२ जिल्हे नव्याने निर्माण केले जाणार आहेत. तसे प्रस्ताव शासनस्तरावर मागविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वर्तमानपत्रातून निदर्शनास आले होते. परंतु लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या जिल्ह्याच्या संदर्भात कुठल्याही हालचाली शासनस्तरावरून आताच करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र आता ब्रह्मपुरीकरांनी जिल्हा मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात शासनाला उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या माध्यमातून पत्रकार संघातर्फे निवेदन देऊन तशी मागणी केली आहे.शासनस्तरावर नविन जिल्हे निर्माण करण्याविषयी हालचाली सुरू असोत अथवा नसोत. पण वेळोवेळी ब्रह्मपुरीवर जो अन्याय केला जात आहे, तो आता सहन केला जाणार नाही. यासाठी ब्रह्मपुरीकरांनी रंगशिंगे फुंकण्याकरिता आंदोलनाची तयारी केली आहे. ‘लोकमत’मध्ये ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी ब्रह्मपुरीकर रणशिंगे फुंकणार, ही बातमी धडकताच ब्रह्मपुरीत हालचालींना आता वेग आला आहे.अनेक राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात वावणाऱ्या नागरिकांनी चर्चा करून एकत्रित येऊन मोठी जिल्हा कृती संघर्ष समिती स्थापन करून लढा देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र निर्माण होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्मपुरी पत्रकार संघाच्या वतीने शासनाला जाणीव करून देण्यासाठी नुकतेच उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना नेताजी मेश्राम, विजय रामटेके, प्रा. रवी रणदिवे, प्रा. विजय मुळे, अरविंद चुनारकर, दत्तात्रय दलाल, दिवाकर मंडपे, जीवन बागडे, शालीक साहारे, दीपक पत्रे, महेश पिलारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.बह्मपुरी जिल्हा निर्मितीबाबत शासनाने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणीही केली. (तालुका प्रतिनिधी)