शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बसला पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 3, 2015 00:50 IST

रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

चंद्रपूर : रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे चंद्रपूर येथील मालधक्क्यावर गहू तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांत उघड्यावर असलेले धानाचे पोते भिजले. यामुळे अतोनात नुकसान झाले असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५९९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रपुरात अचानक हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पाऊस येणार नाही, असे चिन्ह दिसत होते. मात्र, रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू होता. पावसामुळे रेल्वे मालधक्यावर उघड्यावर असलेला गहू भिजला तर रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, तूर आदी पिके अंतिम टप्यात आहेत. मात्र, पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सावली तालुक्यात रात्री दोन वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील रबी पिकांना फटका बसला आहे. खरीप हंगामात कोरडा दुष्काळ आणि रबी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने हाती आलेले पीक गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. चालू वर्षात यापूर्वीही अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. मात्र, ही मदत अत्यल्प असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. चिमूर तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ‘पिकली तर शेती, नाही तर माती’ या म्हणीचा प्रत्यय परिसरात दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे परिसरातील कपाशी, जवस, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मुंग, मोट, मिरची आदी रबी पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे रबी पिकांना नक्की फटका बसला आहे. हरभरा पिकाला पावसामुळे माती लागली आहे. तर गहू पिकावरही पावसाचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे मालाच्या दरावर परिणाम पडेल.- पी. एन. येरगुडेतालुका कृषी अधिकारी, चंद्रपूर.चंद्रपुरात रस्त्यांवर पाणीअवकाळी मुसळधार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. चंद्रपुरातील अनेक मुख्य मार्गावरील गटारे कचऱ्याने तुंबली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊ शकले नाही. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहून गेले. तुकूम परिसरातील गटारे कचऱ्याने तुंबलेली असल्याने ऊर्जानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी वाहत होते. गरिबांचा गहू भिजलाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी चंद्रपूर येथील रेल्वे मालधक्यावर शेकडो क्विंटल गहू उतरविण्यात आला होता. मात्र, अचानक पाऊस झाल्याने गव्हाचे सर्व कट्टे पाण्याने भिजले. कट्यांवर प्लॉस्टीक झाकण्यात आली होती. मात्र, जागेवरच पाणी साचल्याने शेकडो क्विंटल गहू भिजला. मालधक्यावर उतरलेला माल ठेवण्यासाठी चबुतरा नाही. त्यामुळे आलेला माल हा जमीनीवरच ठेवला जातो. गहू भिजल्यानंतर कंत्राटदारांनी सोमवारी दुपारी मालाची उचल केली.