शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पुन्हा बसला पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 3, 2015 00:50 IST

रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

चंद्रपूर : रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे चंद्रपूर येथील मालधक्क्यावर गहू तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांत उघड्यावर असलेले धानाचे पोते भिजले. यामुळे अतोनात नुकसान झाले असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५९९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रपुरात अचानक हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पाऊस येणार नाही, असे चिन्ह दिसत होते. मात्र, रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू होता. पावसामुळे रेल्वे मालधक्यावर उघड्यावर असलेला गहू भिजला तर रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, तूर आदी पिके अंतिम टप्यात आहेत. मात्र, पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सावली तालुक्यात रात्री दोन वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील रबी पिकांना फटका बसला आहे. खरीप हंगामात कोरडा दुष्काळ आणि रबी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने हाती आलेले पीक गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. चालू वर्षात यापूर्वीही अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. मात्र, ही मदत अत्यल्प असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. चिमूर तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ‘पिकली तर शेती, नाही तर माती’ या म्हणीचा प्रत्यय परिसरात दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे परिसरातील कपाशी, जवस, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मुंग, मोट, मिरची आदी रबी पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे रबी पिकांना नक्की फटका बसला आहे. हरभरा पिकाला पावसामुळे माती लागली आहे. तर गहू पिकावरही पावसाचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे मालाच्या दरावर परिणाम पडेल.- पी. एन. येरगुडेतालुका कृषी अधिकारी, चंद्रपूर.चंद्रपुरात रस्त्यांवर पाणीअवकाळी मुसळधार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. चंद्रपुरातील अनेक मुख्य मार्गावरील गटारे कचऱ्याने तुंबली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊ शकले नाही. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहून गेले. तुकूम परिसरातील गटारे कचऱ्याने तुंबलेली असल्याने ऊर्जानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी वाहत होते. गरिबांचा गहू भिजलाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी चंद्रपूर येथील रेल्वे मालधक्यावर शेकडो क्विंटल गहू उतरविण्यात आला होता. मात्र, अचानक पाऊस झाल्याने गव्हाचे सर्व कट्टे पाण्याने भिजले. कट्यांवर प्लॉस्टीक झाकण्यात आली होती. मात्र, जागेवरच पाणी साचल्याने शेकडो क्विंटल गहू भिजला. मालधक्यावर उतरलेला माल ठेवण्यासाठी चबुतरा नाही. त्यामुळे आलेला माल हा जमीनीवरच ठेवला जातो. गहू भिजल्यानंतर कंत्राटदारांनी सोमवारी दुपारी मालाची उचल केली.