शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:22 IST

सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपहाडावरील शेतकरी संकटात : हजारो हेक्टरवरील कापूस पिके धोक्यात

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.परिसरातील सेवादासनगर, दमपुरमोहदा, रोडगुडा, देवलागुडा, मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, लोलडोह, पाटागुडा आदी गावातील शेतकºयांच्या शेतात अशीच परिस्थिती आहे. याच नव्हे तर पहाडावरील प्रत्येक गावात पिके करपली जात असल्याचे चित्र असून कोरडवाहू शेतकºयांवर संकटच कोसळले आहे.अतिदुर्गम समजल्या जाणाºया तालुक्यातील शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोरडवाहू शेतीत कापूस ,ज्वारी, तूर ,सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. सुरूवातीच्या समाधानकारक पावसामुळे शेतकºयांच्या शेतातील पिके डौलदार दिसत होती. यावर्षी तरी चांगले पीक येईल व उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकºयांना होती. मात्र अल्पावधीतच त्यांच्या आशा पावसामुळे मावळल्या आहेत. पेरणीनंतरच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यात नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकºयांच्या शेतातील पिके वाहून गेली तर अनेकांच्या शेतातील पिके पिवळी पडले होती. अशी स्थिती असतानाही पहाडावरील शेतकऱ्यांनी हार मानली नाही. आहे ती पिके जगविण्यासाठी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणी केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खतही टाकले आहेत. गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाने उघाड दिल्याने आणि कडाक्याच्या उन्हामुळे आहे ते पिकेही करपून गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पिके जगविण्यासाठी धडपडज्या शेतकऱ्यांकडे शेतात पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी करपत असलेली पिके जगविण्यासाठी आॅईल इंजिन, विद्युत मोटापंपाच्या साहाय्याने पाणी देत पिके जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. कोरडवाहू शेतकरी मात्र आज ना उद्या पाऊस येईल, या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.मागील काही दिवसांपासून निसर्गाच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपली आहेत. अजून काही दिवस उघाड राहिल्यास पहाडावरील शेतकºयांना जगणे कठीण होईल.- महेश देवकते, उपसभापती पं.स.,जिवती