शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:22 IST

सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपहाडावरील शेतकरी संकटात : हजारो हेक्टरवरील कापूस पिके धोक्यात

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.परिसरातील सेवादासनगर, दमपुरमोहदा, रोडगुडा, देवलागुडा, मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, लोलडोह, पाटागुडा आदी गावातील शेतकºयांच्या शेतात अशीच परिस्थिती आहे. याच नव्हे तर पहाडावरील प्रत्येक गावात पिके करपली जात असल्याचे चित्र असून कोरडवाहू शेतकºयांवर संकटच कोसळले आहे.अतिदुर्गम समजल्या जाणाºया तालुक्यातील शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोरडवाहू शेतीत कापूस ,ज्वारी, तूर ,सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. सुरूवातीच्या समाधानकारक पावसामुळे शेतकºयांच्या शेतातील पिके डौलदार दिसत होती. यावर्षी तरी चांगले पीक येईल व उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकºयांना होती. मात्र अल्पावधीतच त्यांच्या आशा पावसामुळे मावळल्या आहेत. पेरणीनंतरच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यात नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकºयांच्या शेतातील पिके वाहून गेली तर अनेकांच्या शेतातील पिके पिवळी पडले होती. अशी स्थिती असतानाही पहाडावरील शेतकऱ्यांनी हार मानली नाही. आहे ती पिके जगविण्यासाठी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणी केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खतही टाकले आहेत. गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाने उघाड दिल्याने आणि कडाक्याच्या उन्हामुळे आहे ते पिकेही करपून गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पिके जगविण्यासाठी धडपडज्या शेतकऱ्यांकडे शेतात पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी करपत असलेली पिके जगविण्यासाठी आॅईल इंजिन, विद्युत मोटापंपाच्या साहाय्याने पाणी देत पिके जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. कोरडवाहू शेतकरी मात्र आज ना उद्या पाऊस येईल, या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.मागील काही दिवसांपासून निसर्गाच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपली आहेत. अजून काही दिवस उघाड राहिल्यास पहाडावरील शेतकºयांना जगणे कठीण होईल.- महेश देवकते, उपसभापती पं.स.,जिवती