शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:57 IST

एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.

ठळक मुद्देमागणी : प्रवाशांचा खासगी बसकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.इंधनवाढ व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही कारणे पुढे करीत तूट भरुन काढण्यासाठी एसटीमहामंडळाने नुकतीच तिकीट वाढ केली. मात्र त्यामानाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. आजही अनेक बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटलेल्या आहेत, अनेक खुर्च्यांची सिटकव्हर फाटली आहेत, खर्राच्या पिचकाºयांनी बस लाल झालेली आहे. खिडक्याचे काच फुटले आहेत, प्रवासादरम्यान एसटीला धक्का मारण्याची बाब तर नित्याचीच आहे. अशा विविध समस्या एसटीबसमध्ये आढळून येतात. मात्र याची सोडवणूक करण्यासाठी महामंडळाने कधीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे प्रवासी आपोआपच खासगी वाहनाकडे वळत आहेत. परिणामी सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाणारे एसटीमहामंडळ दरवर्षी घाट्यात जात आहे. त्यातही आता तिकीट वाढविण्यात आली आहे. एकीकडे खासगी वाहनांमध्ये विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येत असूनसुद्धा २० ते २५ रुपयांनी तिकिट कमी आकारली जाते परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे.बसमधील प्रथमोपचार पेटी गायबअनावधानाने बसचा अपघात झाल्यास प्रवाशांनावर प्राथमिक उपचार पेटी बसविण्यात आल्या होत्या. मात्र सद्याच्या परिस्थितीत प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. काहीच बसमध्ये या पेटी आढळून येतात. मात्र त्याठिकाणी कोणतेही साहित्य दिसत नाही.वासफाय सेवा ठप्पप्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच बसमध्ये विना अडथळा नेट वापरण्यासाठी महामंडळाने एसटीमध्ये वुड डॉट काम या नावाने वायफास सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये निवडक गाणे, कार्टुन, व्हिडिओ बघता येत होते. मात्र सदर वायफाससेवा बºयाचदा सुरु होत नसल्यांचे प्रवासी सांगतात.सौजन्य अभिवादन योजनेकडे दुर्लक्षमागील काही वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सौजन्य अभिवादन योजना सुरु केली होती. या योजनेनुसार प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर वाहक प्रवाशांना आपला परिचय करुन देतो. त्यानंतर तिकीटची रक्कम तसेच बसबद्दल माहिती देतो. मात्र सद्यास्थितीत ही योजना बंद झाल्याचे दिसून येत आहे.