शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:57 IST

एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.

ठळक मुद्देमागणी : प्रवाशांचा खासगी बसकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.इंधनवाढ व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही कारणे पुढे करीत तूट भरुन काढण्यासाठी एसटीमहामंडळाने नुकतीच तिकीट वाढ केली. मात्र त्यामानाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. आजही अनेक बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटलेल्या आहेत, अनेक खुर्च्यांची सिटकव्हर फाटली आहेत, खर्राच्या पिचकाºयांनी बस लाल झालेली आहे. खिडक्याचे काच फुटले आहेत, प्रवासादरम्यान एसटीला धक्का मारण्याची बाब तर नित्याचीच आहे. अशा विविध समस्या एसटीबसमध्ये आढळून येतात. मात्र याची सोडवणूक करण्यासाठी महामंडळाने कधीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे प्रवासी आपोआपच खासगी वाहनाकडे वळत आहेत. परिणामी सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाणारे एसटीमहामंडळ दरवर्षी घाट्यात जात आहे. त्यातही आता तिकीट वाढविण्यात आली आहे. एकीकडे खासगी वाहनांमध्ये विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येत असूनसुद्धा २० ते २५ रुपयांनी तिकिट कमी आकारली जाते परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे.बसमधील प्रथमोपचार पेटी गायबअनावधानाने बसचा अपघात झाल्यास प्रवाशांनावर प्राथमिक उपचार पेटी बसविण्यात आल्या होत्या. मात्र सद्याच्या परिस्थितीत प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. काहीच बसमध्ये या पेटी आढळून येतात. मात्र त्याठिकाणी कोणतेही साहित्य दिसत नाही.वासफाय सेवा ठप्पप्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच बसमध्ये विना अडथळा नेट वापरण्यासाठी महामंडळाने एसटीमध्ये वुड डॉट काम या नावाने वायफास सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये निवडक गाणे, कार्टुन, व्हिडिओ बघता येत होते. मात्र सदर वायफाससेवा बºयाचदा सुरु होत नसल्यांचे प्रवासी सांगतात.सौजन्य अभिवादन योजनेकडे दुर्लक्षमागील काही वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सौजन्य अभिवादन योजना सुरु केली होती. या योजनेनुसार प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर वाहक प्रवाशांना आपला परिचय करुन देतो. त्यानंतर तिकीटची रक्कम तसेच बसबद्दल माहिती देतो. मात्र सद्यास्थितीत ही योजना बंद झाल्याचे दिसून येत आहे.