शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत हक्कापासूनच नागरिक दूर

By admin | Updated: January 27, 2015 23:31 IST

चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही

रवी जवळे - चंद्रपूरचंद्रपूर : चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही अविकसित आणि दुर्लक्षित आहेत. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागातही याचाच प्रत्यय येतो. येथील नागरिकांना आजही आपल्या मुलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. या प्रभागातील अनेक वस्त्यांमध्ये विकास झालेला नाही. रस्ते, नाल्यांचाच प्रश्न अद्याप सुटू शकला नाही. या प्रभागात बोटावर मोजण्याइतक्या भागातच थोडीफार विकासाची कामे झाली आहे. टॉवर टेकडी परिसर तर विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येते. येथे रस्ते, पाणी, नाल्या, पथदिवे असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.महानगरपालिकेच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधीचा निधी येत असला तरी शहरात विकासकामे करायला महानगरपालिका प्रशासन का कमी पडत आहे, तेच कळत नाही. मनपा प्रशासन नागरिकांकडून विविध टॅक्स न चुकता वसूल करते. नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांचा निधीही शासनाकडून प्राप्त करते. मात्र नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा पुरविल्या जात नाही. लोकमतच्या ‘लोकमत जागर’ या अभियानात सातत्याने याचा प्रत्यय येत आहे. परिणामी नागरिक चांगलेच संतापलेले दिसून येतात.लोकमत चमूने आज मंगळवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागात फेरफटका मारला. यावेळी नागरिकांनी मनपा प्रशासनाविरुध्दचा आपला संतापच लोकमतजवळ व्यक्त केला. या प्रभागातील टॉवर टेकडी परिसरात एकही मुलभूत गोष्ट मनपा नागरिकांना पुरवू शकलेली नाही. संपूर्ण टॉवर टेकडी परिसरातच रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे. एकही रस्ता चांगला असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले नाही. एका रस्त्यावर डांबरीकरण केव्हातरी केले असावे. आता केवळ या रस्त्यावर गिट्टीच वर आल्याचे दिसते. उर्वरित रस्त्यांना तर रस्ते म्हणणेही संयुक्तिक होणार नाही. नागरिकांना आपल्या घरी पायवाटेच जावे लागते. मातीची पायवाटच येथील नागरिकांसाठी रस्ते आहेत. या ठिकाणी रस्ते नाही तर नाही; पण नाल्याही कुठे दिसत नाही. काही लोकांनी सांडपाण्यासाठी आपल्याच खर्चाने पाईप बसविले आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते.टॉवर टेकडी परिसरात आणखी एक समस्या मोठी आहे. हा परिसर जंगलाला लागून असून शहराच्या शेवटच्या टोकावर आहे. मात्र या परिसरात पथदिवे लावण्याचे सौजन्य महानगरपालिकेने दाखविले नाही. कुठेच पथदिवे नसल्याने संपूर्ण परिसरातच रात्री अंधाराचे साम्राज्य असते. याबाबबत नगरसेवकांना वारंवार सांगितले तरीही नगरसेवक लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. टॉवर टेकडी वगळता इतर परिसरातही फारसा विकास झाल्याचे दिसले नाही. आंबेडकर नगर वॉर्डात थोडेफार रस्ते व नाल्यांची कामे झाली आहे. मात्र संत फकीर चौक, संत विक्तुबाबा मठ या परिसरातील रस्ते उखडलेले आहेत. नाल्याही तुटलेल्या आहे. माता नगर चौक व सम्राट चौकातही तीच स्थिती आहे. येथील नाल्यांची डागडुजी गरजेची आहे. सिध्दार्थ नगरातीलही रस्ते उखडलेले दिसले.