शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

महासमाधीचे पावित्र्य राखण्यासाठी वळणमार्ग काढा

By admin | Updated: December 4, 2015 01:28 IST

धुळे-कलकत्ता या सहाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय मार्ग विस्तारिकरणाचे काम नागपूर-अमरावती मार्गावरील गुरूकुंज मोझरी ...

गुरुदेवभक्तांचे वित्तमंत्र्यांना निवेदन : जनभावनेची दखल घ्याचंद्रपूर: धुळे-कलकत्ता या सहाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय मार्ग विस्तारिकरणाचे काम नागपूर-अमरावती मार्गावरील गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळावरून जात आहे. मार्ग विस्तारिकरण करताना समाधीस्थळाची तोडफोक करण्याऐवजी वळणमार्ग काढा; राज्यातील गुरूदेवभक्तांच्या भावना आणि या समाधीस्थळाचे पावित्र्य जपा, अशी विनंती करणारे निवेदन गुरुदेवभक्तांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.एरवि औद्योगिक प्रकल्पांसाठी राज्य मार्ग विदर्भात बदलण्यात आले आहेत. उद्योगांसाठी सरकार अशी शिथिलता दाखवित असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या राष्ट्रसंताच्या समाधीस्थळाबाबत निर्णय शिथिलता दाखवित नसेल तर हा निर्णय लक्षावधी गुरूदेवभक्तांच्या भावनांचा कडेलोट करणारा ठरू शकतो, अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. अखील भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे, दत्ता हजारे, ग्रागिताचार्य बंडोपंत बोढेकर, प्रेमलाल पारधी, उषाताई हजारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन देण्यात आले. राज्य मार्ग तयार करताना गुरूकुंज मोझरीतील महासमाधीस्थळ परिसराजवळून वळणमार्ग बांधण्याची विनंती गुरूदेवभक्तांनी यावेळी केली. महामार्गाच्या विस्तारिकणामध्ये महासमाधीची जागा येत आहे. यामुळे तोडफोड होण्याची शक्यता आहे. ही विटंबना टाळण्यासाठी मार्ग वळविण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. १९३६ मध्ये या आश्रमाची पायाभरणी राष्ट्रसंतांनी केली होती. आश्रमाला लागूनच त्यांनी गुरूदेवनगर या आदर्श गावाची स्थापना केली होती. या स्थळाला तत्कालिन नेतेमंडळींनी भेटी दिल्या होत्या. अ.भा. गुरूदेव सेवामंडळाच्या माध्यमातून देशभरातील २५ हजार शाखांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे कार्य सुरू आहे. राष्ट्रसंतांनी स्थापन केलेला आश्रम आणि त्यांची महासमाधी यातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला पाच लाखांवर भाविक असतात. दररोज हजारो गुरूदेवभक्तांची वर्दळ असते. हे स्थळ महामार्गाने विभाजित झाल्यास या स्थळाचे पावित्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या आणि ग्रामगितेसारख्या ग्रंथांतून समाजाला संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळाचे सरकारने जतन करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. या प्रकरणी आपण लक्ष घालून सरकारकडे भावना कळवू, असे आश्वासन वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी गुरूदेवभक्तांच्या शिष्टमंडळाला दिले. (जिल्हा प्रतिनिधी)