शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

त्रुटींसह होणार उड्डाण पुलाचे लोकार्पण

By admin | Updated: March 17, 2016 00:53 IST

सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

कामाची कासवगती सुरूच : लाखोंचा दंड ठोठावूनही कंत्राटदार ढिम्मचंद्रपूर : सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तशी अधिकृत घोषणा झाली असली तरी अद्याप उड्डाण पुलालगतच्या आयटीआयसमोरील रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे नवा उड्डाण पूल जुन्या पुलाला जोडताना मोठी त्रुटी निर्माण झाली असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मूल मार्गाने जुन्या पुलावरून नव्या पुलावर चढताना त्या ठिकाणी मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांना या खोलगट भागातून वळताना अपघात घडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित ‘लेव्हलिंग’ करण्यात कंत्राटदाराने दिरंगाई केल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच या उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गाडेगोने, कोडगिरवार, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता गाडेगोन यांनी पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. पुलाचे बांधकाम जवळपास काम पूर्ण झाले असून केवळ विजेचे खांब उभारण्याचे काम बाकी आहे. ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे. आयटीआयसमोरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती गाडेगोने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येत्या १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सन २०१२ मध्ये या उड्डाण पुलाचे काम सुरू झाले. १६.३ कोटी रुपये खर्चाचा हा उड्डाण पूल सन २०१४ च्या अखेरीस पूर्ण करण्याचा करार कंत्राटदाराशी झाला होता. या कामाचे कंत्राट ठाणे येथील मे.अजय पाल मंगल अ‍ॅन्ड कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीने सन २०१६ हे वर्ष उजाडले तरी उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास नेले नाही. परिणामी १६.३ कोटींचा खर्च २० कोटीच्या घरात गेला आहे. कंत्राटदार कंपनीची कामाबाबतची कासवगती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आॅक्टोबर २०१२ ते ३१ मार्च २०१४ या काळात दरदिवशी पाच हजार रुपये दंड ठोठावला. (स्थानिक प्रतिनिधी)एका विंगचे काम अद्याप बाकीचउड्डाण पुलावरून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विंगचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे उड्डाण पूल सुरू झाल्यानंतरही मूल मार्गाने येणाऱ्या वाहनांना आंबेडकर महाविद्यालयाकडे वळता येणार नाही. येत्या आॅगस्टपर्यंत या विंगचे काम पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे. मात्र उड्डाण पुलाच्याच कामाला इतका विलंब लागल्याने ठरावीक वेळेत या विंगचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न आहे.