शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

त्रुटींसह होणार उड्डाण पुलाचे लोकार्पण

By admin | Updated: March 17, 2016 00:53 IST

सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

कामाची कासवगती सुरूच : लाखोंचा दंड ठोठावूनही कंत्राटदार ढिम्मचंद्रपूर : सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तशी अधिकृत घोषणा झाली असली तरी अद्याप उड्डाण पुलालगतच्या आयटीआयसमोरील रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे नवा उड्डाण पूल जुन्या पुलाला जोडताना मोठी त्रुटी निर्माण झाली असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मूल मार्गाने जुन्या पुलावरून नव्या पुलावर चढताना त्या ठिकाणी मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांना या खोलगट भागातून वळताना अपघात घडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित ‘लेव्हलिंग’ करण्यात कंत्राटदाराने दिरंगाई केल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच या उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गाडेगोने, कोडगिरवार, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता गाडेगोन यांनी पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. पुलाचे बांधकाम जवळपास काम पूर्ण झाले असून केवळ विजेचे खांब उभारण्याचे काम बाकी आहे. ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे. आयटीआयसमोरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती गाडेगोने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येत्या १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सन २०१२ मध्ये या उड्डाण पुलाचे काम सुरू झाले. १६.३ कोटी रुपये खर्चाचा हा उड्डाण पूल सन २०१४ च्या अखेरीस पूर्ण करण्याचा करार कंत्राटदाराशी झाला होता. या कामाचे कंत्राट ठाणे येथील मे.अजय पाल मंगल अ‍ॅन्ड कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीने सन २०१६ हे वर्ष उजाडले तरी उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास नेले नाही. परिणामी १६.३ कोटींचा खर्च २० कोटीच्या घरात गेला आहे. कंत्राटदार कंपनीची कामाबाबतची कासवगती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आॅक्टोबर २०१२ ते ३१ मार्च २०१४ या काळात दरदिवशी पाच हजार रुपये दंड ठोठावला. (स्थानिक प्रतिनिधी)एका विंगचे काम अद्याप बाकीचउड्डाण पुलावरून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विंगचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे उड्डाण पूल सुरू झाल्यानंतरही मूल मार्गाने येणाऱ्या वाहनांना आंबेडकर महाविद्यालयाकडे वळता येणार नाही. येत्या आॅगस्टपर्यंत या विंगचे काम पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे. मात्र उड्डाण पुलाच्याच कामाला इतका विलंब लागल्याने ठरावीक वेळेत या विंगचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न आहे.