शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेतील अटी शिथिल करा

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याची मागणी नगरसेवक संजय वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.

संजय वैद्य : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याची मागणी नगरसेवक संजय वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून त्यात घरकूल मंजुरीसाठी चार टप्पे करण्यात आले आहेत. या योजनेत विशेषत: कच्च्या घराचा पक्क्या घरात बदल करण्यापासून तर कुठेही, कोणतेही स्वत:चे घर नसलेल्या भाडेकरू नागरिकांना स्वमालकीचे घर देण्यापर्यंत समावेश आहे. याशिवाय दोन लाख रुपयांच्या अनुदानापासून ते बँकेमार्फत कर्ज रूपाने ६.३० टक्के व्याज दराने देण्यात येणाऱ्या ६ लाख रुपयांपर्यंतच्या निधीचाही योजनेत समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी मनपा करीत असून घरकुलासाठी मागणी अर्ज करण्यास नागरिकांची झुंबड उडत आहे. पण योजनेतील काही अटींमुळे महानगरातील ७० टक्के नागरिक या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वैद्य यांनी वर्तविली आहे. योजनेतील घटक क्रमांक १ व ३ मध्ये जागा मालकीची, कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. पण, घटक क्रमांक १ साठी मनपा हद्दीतील घोषित झोपडपट्टी भागात कच्चे घर असणे आवश्यक आहे. घटक क्रमांक ३ मध्ये घरकूल बांधण्यासाठी बँकेद्वारे कर्जपुरवठा केला जाणार आहे. शहरातील ६० ते ७० टक्के रहिवासी वस्ती नझूल जागेवर आहे. अद्याप त्यांना कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाहीत. शिवाय खासगी मालकीच्या लेआऊटमध्ये ज्या नागरिकांची घरे आहेत. त्यामध्ये रहेमतनगर, सिस्टर कॉलनी, स्वावलंबीनगर, पठाणपुरा गेट वस्तीचा समावेश आहे. पण, हा भाग पूरग्रस्त क्षेत्रात असल्यामुळे नगररचना विभागाच्या नियमानुसार ही जागा बांधकाम मंजुरीसाठी अधिकृत ठरणार नाही. यासोबतच बंगाली कॅम्प ते बल्लारपूर वळणमार्गापर्यंतच्या परिसरातील खासगी लेआऊटमधील वस्ती ही वेकोलिच्या कोल बेल्ट क्षेत्रात येत असल्यामुळे हा परिसरसुद्धा बांधकाम मंजुरीसाठी अनधिकृत ठरणार असल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे. भाडेकरूंसाठी असलेल्या घटकात शहरात किंवा शहराबाहेर घरकुलाचे बांधकाम करण्यास स्वस्त दराची खासगी किंवा शासकीय जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या घटकातील नागरिकही योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर योजना मुंबई, पुणे यासारख्या महानगरासारखी लागू केली आहे. ते निकष चंद्रपूर महानगरात लागू होत नाही. चंद्रपुरात घरकुलांची अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घरकुलाची मागणी व निकष लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी करावी. सदर अटींचा ताळमेळ बसवावा यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे नगरसेवक संजय वैद्य यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)