शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला शासनाच्या विभागाचा दर्जा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:22 IST

एसटी महामंडळातील कामगारांना अपेक्षित व चांगली वेतन वाढ मिळण्यासाठी एसटीचा-शासनाचा अंगिकृत उपक्रम हा दर्जा काढून त्या ऐवजी शासनाचा विभाग म्हणून दर्जा द्यावा. त्यामुळे एसटीचे अर्थकारण बदलून कामगारांना सन्मानजक पगार वाढ मिळेल.

ठळक मुद्देभाई जगताप : एसटी कर्मचारी विदर्भ मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळातील कामगारांना अपेक्षित व चांगली वेतन वाढ मिळण्यासाठी एसटीचा-शासनाचा अंगिकृत उपक्रम हा दर्जा काढून त्या ऐवजी शासनाचा विभाग म्हणून दर्जा द्यावा. त्यामुळे एसटीचे अर्थकारण बदलून कामगारांना सन्मानजक पगार वाढ मिळेल. संप काळात तथाकथित नेतृत्वाच्या अपरिपक्वतेमुळे वेतन वाढ मिळाली नाही.त्यावेळी केवळ यांच्या वेतन वाढीच्या मागणीत ‘वेतन आयोग’ हे दोनच शब्द अडचणीचे ठरले असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी केले.येथील चंद्रपूर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात शनिवारी संघटनेचा विदर्भ विभागातील प्रमुख कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपुर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोडे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका सुनिता लोढीया, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शिवाराव, कामगार नेते सुनील शिंदे, संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे, कार्याध्यक्ष बी.के.देशमुख, विजय बोरगमवार, विभागीय अध्यक्ष राजेश सोलापन आदी उपस्थित होते.जगताप पुढे म्हणाले, आजपर्यंत कधीही एसटी महामंडळातील कामगारांना वेतन आयोगाप्रमाणे वाढ मिळालेली नाही. मात्र आता वेतन आयोगाची मागणी करण्यात आली. या मागणीमध्ये ‘वेतन आयोग’ हे दोन शब्दच अडचणीचे ठरले. मात्र शब्द कोड्यात न गुंतता शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वाढ मागीतली असती, तर हा प्रश्न मार्गी लागून अपेक्षित वाढ मिळाली असती, असे ते म्हणाले. तसेच परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या प्रवाशांसाठी आणि एसटीच्या भविष्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाला राज्य शासनाचा एक भाग म्हणून दर्जा देण्यासाठी योग्य त्या कायदेशिर प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशी मागणीही जगताप यांनी केली. यावेळी विभागीय सचिव गणेशसिंग बैस, रत्नाकर नंदनवार, सी.पी.राठोड, फैयाज पठाण, आयुब खान, फिरोज खान, रामा राठोड उपस्थित होते.