शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:37 IST

रुग्णालयातील कारभारामुळे रुग्ण त्रस्त झाले आहे. त्यामुळे लोकमतने ९ सप्टेंबरपासून रुग्णालयातील असुविधांबाबत वृत्तमालिका चालवून शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देरूग्णालयाचा आढवा : प्रत्येक ठिकाणी यंत्रणा सक्षम ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रुग्णालयातील कारभारामुळे रुग्ण त्रस्त झाले आहे. त्यामुळे लोकमतने ९ सप्टेंबरपासून रुग्णालयातील असुविधांबाबत वृत्तमालिका चालवून शासनाचे लक्ष वेधले. या वृत्तमालिकेमुळे जिल्हाभरातील आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकमतच्या बातम्यांवरून काँग्रेसनेही आवाज उठविला. आता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनीही याची गंभीर दखल घेतली असून बुधवारी आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकाºयांना आपल्या कक्षात बोलावून रुग्णालयातील कारभाराचा आढावा घेतला. गोरगरिब रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटीबध्द असून या यंत्रणेवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार आहे, असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर येथील सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापनाचे सूत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेले आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. एम. जे. खान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. श्रीरामे, डॉ. प्रिती प्रियदर्शनी, डॉ. बेंबे आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाºयांनी सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागातील कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी गेल्या पाच वर्षातील प्रसूती व नवजात बालकांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी जाणून घेतली. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यापासून गडचिरोली, यवतमाळ जिल्हयातून मोठया प्रमाणात रुग्ण येत आहे. त्यामुळे प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य यंत्रणेने प्रत्येक टप्प्यावर अ‍ॅलर्ट असावे, अशी तंबी जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिली. जिल्हा शल्य चिकित्सकांनीही आपल्या स्तरावरील यंत्रणा बळकट करण्याबाबतचे निर्देश वेळोवेळी संबंधितांना द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिल्या.बालमृत्यूबाबत बोलताना बालरोग तज्ज्ञ डॉ. एम. जे. खान यांनी या ठिकाणी मोठया संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने बालमृत्यूची आकडेवारी अधिक वाटत असल्याचे जिल्हाधिकाºयांसमोर स्पष्ट केले. जिल्हयातील दुर्गम भागातील रुग्णांना येथे पोहचेपर्यंत उशीर होतो. त्यामुळे प्रसुती संदर्भातील रुग्णांची अधिक काळजी स्थानिक पातळीवरच घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाºयांना सांगून आपल्या कोर्टातील चेंडू इतरत्र ढकलला. यावेळी बालमृत्यू कशामुळे होत आहे. त्याची कारणे कोणती आहेत, याची चर्चाही जिल्हाधिकाºयांनी केली.सामान्य रुग्णालयात बेडवरच महिलेची प्रसुतीचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सातत्याने बालमृत्यू होत असताना व्यवस्थापन किती गंभीर आहे. याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा आला. वेळीच उपचार न मिळाल्याने एका महिलेने चक्क बेडवरच आपल्या बाळाला जन्म दिल्याची घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत माहिती घेतली असता असे प्र्रकार येथे नवीन नसल्याचे सूत्राने सांगितले. मंगळवारी एक महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात भरती झाली. ती वॉर्ड क्र.९ मधील बेड क्र. ३ येथे होती. महिलेला आज प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतरही तिची दखल कुणीही घेतली नाही. अखेर त्या महिलेने त्याच बेडवर एका बाळाला जन्म दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाल्याचेही सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.