शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

बोजा चढवून देण्यास तलाठ्याचा नकार

By admin | Updated: April 9, 2015 01:16 IST

बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती.

नागभीड : बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. पण येथील काही युवकांनी तहसिलदार श्रीराम मुंदडा यांच्याकडे तक्रार करताच तलाठी सरळ झाला.ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न आहे, अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला २५ हजाराचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बाम्हणी येथील भाऊराव भुळे या शेतकऱ्याने या योजनेसाठी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अर्ज केला. बँकेने तो मंजुरीही केला अािण तलाठ्यांकडून जमीनीवर बोजा चढवून आणा, अशी भुळे यांना सूचना दिल्या.बँकेच्या सूचनेनुसार भुळे तलाठ्याकडे गेले. पण तलाठी भुळे यांना दाद देईना. अपाल्या पातळीवर भुळे यांनी विविध प्रयत्न केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी भुळे यांनी मोहाळीचे माजी सरपंच अमित देशमुख आणि युवा कार्यकर्ते समिर भोयर यांच्याकडे धाव घेतली. देशमुख आणि भोयर यांनी भुळे यांना सोबत घेवून तहसिलदार श्रीराम मुंदडा यांची भेट घेतली व त्यांना झालेला प्रकार सांगितला. तहसिलदार मुंदडा यांनी या प्रकाराबद्दल तलाठ्याला विचारणा केली व सदर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून देण्याच्या सुचना केल्या. (तालुका प्रतिनिधी)