शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बोजा चढवून देण्यास तलाठ्याचा नकार

By admin | Updated: April 9, 2015 01:16 IST

बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती.

नागभीड : बँकेची कुठलीही हरकत नसताना केवळ तलाठ्याच्या आडकाठी धोरणामुळे बाम्हणी येथील एका शेतकऱ्याला विवाह कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. पण येथील काही युवकांनी तहसिलदार श्रीराम मुंदडा यांच्याकडे तक्रार करताच तलाठी सरळ झाला.ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न आहे, अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला २५ हजाराचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बाम्हणी येथील भाऊराव भुळे या शेतकऱ्याने या योजनेसाठी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अर्ज केला. बँकेने तो मंजुरीही केला अािण तलाठ्यांकडून जमीनीवर बोजा चढवून आणा, अशी भुळे यांना सूचना दिल्या.बँकेच्या सूचनेनुसार भुळे तलाठ्याकडे गेले. पण तलाठी भुळे यांना दाद देईना. अपाल्या पातळीवर भुळे यांनी विविध प्रयत्न केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी भुळे यांनी मोहाळीचे माजी सरपंच अमित देशमुख आणि युवा कार्यकर्ते समिर भोयर यांच्याकडे धाव घेतली. देशमुख आणि भोयर यांनी भुळे यांना सोबत घेवून तहसिलदार श्रीराम मुंदडा यांची भेट घेतली व त्यांना झालेला प्रकार सांगितला. तहसिलदार मुंदडा यांनी या प्रकाराबद्दल तलाठ्याला विचारणा केली व सदर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून देण्याच्या सुचना केल्या. (तालुका प्रतिनिधी)