शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

लाल्या रोगाने पऱ्हाटीचे पीक घटणार

By admin | Updated: November 30, 2014 23:02 IST

भिसी व परिसरातील पऱ्हाटीवर लाल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाड सुकत असून पऱ्हाटीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला असून लाल्या

चंद्रपूर : भिसी व परिसरातील पऱ्हाटीवर लाल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाड सुकत असून पऱ्हाटीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला असून लाल्या रोगाचा ओलित असलेल्या कापसाला फटका बसताना दिसत आहे.भिसी, कपर्ला, येरखडा, डोंगला, सावली, खापरी, कन्हाळगाव, पिंपळनेरी, उमरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या पऱ्हाटीला लाल्या रोगाने ग्रासले आहे. कमी पावसाचा परिणाम पऱ्हाटीवर झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक जात असल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.या ना त्या कारणावरून शेतकऱ्यांची फरकट सुरू असताना आता उभे पीक हातातून जात असल्यामुळे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे साधन नसल्याने लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाने दगा दिला आणि आता कापूसही हातातून जाणार या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.दोन वर्षापुर्वी सोयाबीन पिकाची पेरणी या भागात मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु पिकाच्या उत्पादनातून सतत घट होत असल्याने शेतकऱ्यांनी पऱ्हाटीची लागवड केली. यावर्षी कमी पावसाने पऱ्हाटीलाही झटका बसला ज्यांनी सोयाबीन पेरले त्यांना एकरी अर्धा पोता सोयाबीन उत्पन्न झाले. त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. शेत पिकांची नासाडी झाल्याने शासनाने चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)