शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेतीअभावी वेकोलिच्या भूमिगत खाणीतील उत्पन्नात घट

By admin | Updated: May 11, 2014 00:14 IST

माजरी भूमिगत कोळसा खदानीत कोळसा खाढल्यानंतर त्या जागी भरण्याकरिता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरू शकत नसल्याने भूमिगत कोळसा खदानीतील

ंवरोरा : माजरी भूमिगत कोळसा खदानीत कोळसा खाढल्यानंतर त्या जागी भरण्याकरिता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरू शकत नसल्याने भूमिगत कोळसा खदानीतील प्रति दिवस ११०० टन उत्पादन देणार्‍या खदानीला मागील पाच महिन्यांपासून प्रतिदिन ३०० टन कोळसा उत्पादन होत आहे. त्यामुळे स्थायी कामगारांमध्ये असुरक्षिततचे वातावरण पसरले असून रेतीअभावी भूमिगत कोळसा खदानीत आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भूमिगत कोळसा खदानीत कोळसा काढल्यानंतर पाणीमिश्रीत रेती भरण्यात येते. त्यानंतर पुढील कोळसा काढला जातो. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता कमी असल्याने भूमिगत कोळसा खदानीत कामगारही सुरक्षीत राहते. रेतीचा भरणा केला. नाही तर मोठा अपघातही होण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसात रेती अभावी आग लागण्याची मोठी शक्यता असते. भूमिगत कोळसा खदानीत उत्पादनाच्या १.८ टक्के रेतीचा भरणा करणे आवश्यक असते. भूमिगत कोळसा खदानीत १०३९ स्थायी कामगार कार्यरत आहे. मागील दोन वर्षांपासून पाच हेक्टर आराजी असलेल्या घाटातील रेती काढण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागते. वेकोलिच्या वतीने पर्यावरण विभागाकडे रेतीच्या मंजुरीकरिता प्रकरण पाठविण्यात आले आहे. याकरिता पर्यावरण विभागाची एक चमू येऊन निरीक्षण करून गेली परंतू अद्यापही मंजुरी मिळाली नाही. सध्या कोळसा काढलेल्या ठिकाणी मिश्रीत माती भरण्यात येत आहे. ११०० टन प्रति दिन उत्पादन करणार्‍या या भूमिगत खदानीचे उत्पादन सध्या दिवसाकाठी ३०० टनावर घसरले आहे. उन्हाळ्यामध्ये रेती अभावी खदानीत आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट आल्याने कामगारांमध्ये भिती व्यक्त केल्या जात आहे. उत्पादनात घट आल्याने कामगारांचे स्थानांतरण इतरत्र केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अनेक कामगार वणी, वरोरा, माजरी परिसरात स्थायी झाले आहे. त्यांचे स्थानांतरण झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनाही झळ सोसावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. रेतीकरिता १ कोटी ६० लाख शासनास देणे आहे. त्यातील ४४ लाखाचा भरणा केला. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. उत्पादनात घट झाल्याने कामगारांना अतिरिक्त सुविधा देता येत नाही. एक महिन्यात रेती मिळणे आवश्यक आहे. मागील काही महिन्यापासून रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव प्रकाशीत न करण्याच्या अटीवर दिली. (तालुका प्रतिनिधी)