शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

धानाची आवक घटली

By admin | Updated: March 11, 2015 01:00 IST

केंद्र शासनाने तांदुळ निर्यातीवर बंदी घालताच त्याचा परिणाम राईस मिल उद्योगावर पडला आहे. यामुळे राईस मिल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून धानाची खरेदी-विक्री मंदावली आहे.

चंद्रपूर : केंद्र शासनाने तांदुळ निर्यातीवर बंदी घालताच त्याचा परिणाम राईस मिल उद्योगावर पडला आहे. यामुळे राईस मिल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून धानाची खरेदी-विक्री मंदावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुुळे तांदुळ उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. याला जबाबदार केंद्र शासनाने केलेल्या बासमती तांदळावरील निर्यात बंदी आहे, बंदी होताच बाजार समिती मधील धान विक्री मंदावली व त्याच बरोबर धानाचे भाव ५०० ते ७०० रुपयाने घसरले आहेत.जिल्ह्यात सिंदेवाही, मूल, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पानात अग्रेसर आहेत. या तालुक्यात राईस मिलची संख्याही मोठी आहे. परंतु तांदूळ निर्यातीच्या बंदीमुळे राईस मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. धानाची विक्री कमी झाली, आणि दरही घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनी धान खरेदी बंद केल्यामुळे बाजारात धानाची विक्री कमी होवू लागली आहे. आणि म्हणूनच धानाचे भाव घसरले. मागील वर्षी श्रीराम धानाला २२०० ते २४०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. परंतु यावर्षी १८०० रूपये दर मिळणेही कठीण झाले आहे. म्हणजे शासन निर्णय शेकतऱ्यांसाठी घातक ठरत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर, शेतकरी तर आत्महत्या करतीलच पण राईस मिल मालकावरही ही वेळ येऊ शकते. (स्थानिक प्रतिनिधी)