शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्र गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:30 IST

शहरापासून ते दुर्गम भागापर्यंत एस. टी. पोहोचली आहे. स्पर्धेच्या काळात प्रवाशांची आजही एस. टी.लाच अधिक पसंती आहे. मात्र, काही ...

शहरापासून ते दुर्गम भागापर्यंत एस. टी. पोहोचली आहे. स्पर्धेच्या काळात प्रवाशांची आजही एस. टी.लाच अधिक पसंती आहे. मात्र, काही अडचणींचा प्रवाशांना आजही सामना करावा लागत आहे. विशेषत: आग लागल्यास त्वरित उपाययोजना म्हणून प्रत्येक एस. टी.मध्ये अग्निशमन यंत्र असणे गरजेचे आहे. यासाठी तशी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश बसमधील हे यंत्र गायब झाले आहे.त्यामुळे एखाद्यावेळी आग लागल्यास काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, काही नवीन बसमध्येही यंत्र नसल्यामुळे महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र

चंद्रपूर - वणी

चंद्रपूर - मुकूटबन

राजुरा - अमरावती

--

बाॅक्स

प्रथमोपचार पेट्याही गायब

चंद्रपूर विभागअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर आगार येतात. यामध्ये शेकडो बस दररोज ये-जा करतात. मात्र, बहुतांश बसमधील प्रथमोपचार पेट्या गायब असल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स

वायफाय नावालाच

काही वर्षांपूर्वी महामंडळाने एस. टी.मध्ये वायफाय सेवा सुरू केली होती. काही आगारांमध्येही प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, सध्या एस. टी. तसेच आगारातील ही सेवा बंद पडली आहे. लाखो रुपये खर्च करूनही सुरु केलेल्या या सेवांतून महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे.

- देखभाल दुरुस्ती नावालाच

देखभाल दुरुस्तीसाठी एस. टी.ची स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, लक्ष देऊन कामच केले जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियमित स्वच्छता करणे गरजेचे असताना याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पाहिजे तशी स्वच्छता बसमध्ये बघायला मिळत नाही.

--

चंद्रपूर येथील बसस्थानकाचे आता नव्याने बांधकाम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरत्या शेडमधून एस. टी.चा कारभार सुरू आहे. मात्र, स्वच्छतेकडे पाहिजे तसे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.