शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

लाल पोथरा कालव्याला भगदाड

By admin | Updated: November 2, 2014 22:31 IST

सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : शेतकरी आंदोलन तीव्र करणारवरोरा : सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडल्याने वाढोडा गावानजीक कालव्याला पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे भगदाड पडून लाखो लिटर पाणी व्यर्थ गेले. आता पाणी थांबविले असून भगदाडाची दुरुस्ती होईपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे आता शेतकरी आपले आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील लाल व पोथरा कॅनलमधून पाणी सोडले जाते. सध्याच्या हंगामात दुबार पिकाकरिता शेतकऱ्यांनी आपल्या शेत्या तयार केल्या. परंतु पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटन केले नाही. समित्यांच्या बैठका घेतल्या नाही. त्यामुळे पाणी कालव्यात केव्हा येईल याची माहिती नाही. परिणामी २७ गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या वरोरा कार्यालयात मागील दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत एक दिवसापूर्वीपासून कालव्यात पाणी सोडणे सुरू केले. कालव्यात सर्वप्रथम ४ क्युबिक मीटर पाणी सोडावे लागते. परंतु आंदोलन त्वरित संपले पाहिजे व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचले पाहिजे, याकरिता एकाच वेळी दोन्ही कालव्यातून प्रत्येकी ४ क्युबिक मीटर पाणी सोडण्यात आले. वाढोडा गावानजीकच्या कालव्यात ८ क्युबिक मीटर पाणी एकाच वेळेस आल्याने कालव्याला मोठे भगदाड पडले. पाटबंधारे विभागााला याची माहिती मिळेपर्यंत लाखो लिटर पाणी व्यर्थ गेले. त्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. आता कालव्याच्या या भगदाडाची दुरुस्ती होतपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाचा कामचुकारपणा परत एकदा समोर आला आहे.वरोरा येथील पाटबंधारे अभियंत्याचे स्थानांतरण वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही व शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने वरोरा येथे कार्यरत पाटबंधारे विभागाच्या एका अभियंत्याचे तातडीने स्थानांतर केले असल्याचे समजते. त्या जागी कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग नागपूर येथून अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)