शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

लाल पोथरा कालव्याला भगदाड

By admin | Updated: November 2, 2014 22:31 IST

सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : शेतकरी आंदोलन तीव्र करणारवरोरा : सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडल्याने वाढोडा गावानजीक कालव्याला पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे भगदाड पडून लाखो लिटर पाणी व्यर्थ गेले. आता पाणी थांबविले असून भगदाडाची दुरुस्ती होईपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे आता शेतकरी आपले आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील लाल व पोथरा कॅनलमधून पाणी सोडले जाते. सध्याच्या हंगामात दुबार पिकाकरिता शेतकऱ्यांनी आपल्या शेत्या तयार केल्या. परंतु पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटन केले नाही. समित्यांच्या बैठका घेतल्या नाही. त्यामुळे पाणी कालव्यात केव्हा येईल याची माहिती नाही. परिणामी २७ गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या वरोरा कार्यालयात मागील दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत एक दिवसापूर्वीपासून कालव्यात पाणी सोडणे सुरू केले. कालव्यात सर्वप्रथम ४ क्युबिक मीटर पाणी सोडावे लागते. परंतु आंदोलन त्वरित संपले पाहिजे व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचले पाहिजे, याकरिता एकाच वेळी दोन्ही कालव्यातून प्रत्येकी ४ क्युबिक मीटर पाणी सोडण्यात आले. वाढोडा गावानजीकच्या कालव्यात ८ क्युबिक मीटर पाणी एकाच वेळेस आल्याने कालव्याला मोठे भगदाड पडले. पाटबंधारे विभागााला याची माहिती मिळेपर्यंत लाखो लिटर पाणी व्यर्थ गेले. त्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. आता कालव्याच्या या भगदाडाची दुरुस्ती होतपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाचा कामचुकारपणा परत एकदा समोर आला आहे.वरोरा येथील पाटबंधारे अभियंत्याचे स्थानांतरण वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही व शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने वरोरा येथे कार्यरत पाटबंधारे विभागाच्या एका अभियंत्याचे तातडीने स्थानांतर केले असल्याचे समजते. त्या जागी कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग नागपूर येथून अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)