शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

लाल-पोथरा कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:43 IST

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता वरदान ठरु पाहणारा बहुचर्चित लाल व पोथरा कालवा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या कालव्यास बेलगाव नजीक मागील कित्येक दिवसांपासून भगदाड पडले असल्याने ग्रामस्थांना अडीच किमीचा फेरा मारावा लागत आहे.

ठळक मुद्देसमस्या निर्माण होणार : लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता वरदान ठरु पाहणारा बहुचर्चित लाल व पोथरा कालवा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या कालव्यास बेलगाव नजीक मागील कित्येक दिवसांपासून भगदाड पडले असल्याने ग्रामस्थांना अडीच किमीचा फेरा मारावा लागत आहे.वरोरा तालुक्यातील शेतकºयांना दुबार पीक घेता यावे, यासोबतच सिंचनाची सोय व्हावी याकरिता लाल व पोथरा कालव्याची निर्मिती करण्यात आली. या कालव्यास वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडले जाते. कालव्यातील पाण्यावर शेकडो शेतकरी विसंबून असतात. मात्र कालव्याची उन्हाळ्यात स्वच्छता केली जात नसल्याने शेतीच्या हंगामात कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नाही. अनेक ठिकाणी कालवा फुटल्याने पाणी व्यर्थ जात असते. अशा अनेक बाबी मागील कित्येक वर्षापासून कालव्यामध्ये घडत आहे. कालव्याला बेलगाव नजीक मोठे भगदाड पडले असून तीन महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारही केली. परंतु, अद्यापही भगदाड बुजविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. कालव्या नजीक एक नाला वाहतो. भगदाडातून पाणी नाल्यात गेल्यास पावसाळ्यात बेलगावला पुराचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी कालव्याचे भगदाड बुजविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.बेलगाव येथे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती तांत्रिक विभागाकडे देण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे भगदाड दुरस्तीचे अंदाजपत्रक पाठविले आहे.- खुशाल झाडे, उपविभागीय अभीयंता वरोरा.