शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसांत दीड लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:46 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईने वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर सुरु केला आहे.

ठळक मुद्देवाहतूक शाखेची कारवाई : २७२ दुचाकीस्वार आढळले हेल्मेटविना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईने वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर सुरु केला आहे.चंद्रपुरात एकाच आठवड्यात घडलेल्या दोन अपघाताच्या घटनेत एक शिक्षिका व एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दखल घेत जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले.त्यानुसार वाहतूक विभागाने शहरातील विविध चौकामध्ये तसेच मुख्य मार्गावर वाहतूक शिपायांची नियुक्ती करुन विना हेल्मेटने गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे सुरु केले असून प्रत्येक वाहनचालकांंना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.त्यानुसार मागील पाच दिवसात वाहतूक विभागाने २७२ वाहनचालकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात वाहतूक निरिक्षक विलास चव्हाण व त्यांच्या चमूने केली.हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांचा सत्कारहेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्याच्या दृष्टीने वाहतूक विभागाने हेल्मेट घालून प्रवास करणाºया वाहनधारकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच आपल्या आप्तेष्ठांना हेल्मेट घालण्याबाबात प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले.सक्ती नकोय, रस्त्याची दुरुस्ती कराशहरातील रस्त्यावरील खड्ड्याने एका शिक्षिकेचा व एका १७ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरातील रस्त्याचा व वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्ती लागू केली. त्यानुसार विना हेल्मेट वाहनचालविणाºयांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातात जीव जात असताना त्यावर आळा घालण्यासाठी हेल्मेट सक्ती हा पर्याय नसून रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सुरु शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.कारवाईपोटी ‘टप्पर’ हेल्मेटचा वापरजिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी १४ जुलैला हेल्मटसक्ती लागू केली. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेटने गाडी चालवणाऱ्यांना वाहनधारकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले शंभर ते दोनशे रुपये किंमतीचे टप्पर हेल्मेटचा वापर करताना दिसून येत आहेत.अपघात वेळी-अवेळी होऊ शकतात. त्यामुळे नेहमी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत. ही घटना टाळण्यासाठी वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा.- विलास चव्हाण,वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर