शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीच्या गौण खनिजातून ८६ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: April 30, 2015 01:23 IST

विनापरवाना अवैधरीत्या मुरूम, रेती, गिट्टी आदी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे.

चंद्रपूर : विनापरवाना अवैधरीत्या मुरूम, रेती, गिट्टी आदी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र असे असतानाही अनेक नागरिक स्वत:च्या स्वाथार्साठी छुप्या मार्गाने गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक करतात. या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर महसूल विभागाचे पथक नियुक्ती करण्यात आले आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी १ हजार ६३२ प्रकरणात एकूण ८६ लाख ४० हजार ७२४ रूपयांचा दंड वसूल केला आहे. यावर्षी रेती घाटांचे लिलाव उशीरा झाल्याने अनेक कंत्राटदारांनी अवैध मार्गाने रेती वाहतूक सुरू केली. काही कंत्राटदारांनी रात्रीची पाळत ठेवून ट्रकद्वारे वाहतूक सुरू केली होती. त्यानंतर प्रशासनाने धडक मोहीम सुरू करून अनेकांना रंगेहात पकडले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रेती, गिट्टी, मुरूम आदी गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची असते. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आपल्या क्षेत्रात धाड सत्र राबवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाईचे अधिकार असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उपविभागातात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवून अवैधरित्या गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या १ हजार ६३२ प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणातून संबंधित दोषी वाहतुकदारांकडून ८६ लाख ४० हजार ७२४ रूपयांचा दंड वसूल केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)तस्कर झाले गब्बरजिल्ह्यातील अनेक रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. मात्र खनिकर्म विभागाने ठरवून दिलेल्या जागेपेक्षा जास्त उत्खनन करण्याचे काम कंत्राटदारांकडून सुरू आहे. हा प्रकार अनेक ठिकाणी सुरू असला तरी मारहाणीच्या घटनांमुळे अधिकारी, कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने अधिकारी गब्बर झाले आहेत. यावर आळा घालण्याची मागणी होत आहे. धडक मोहीम तीव्र होण्याची गरज शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासन व जिल्हा खनिकर्म विभागाला दरवर्षी गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाई करून अधिकाधिक दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र अनेकदा तस्कर हे अधिकाऱ्यांनाच मारहाण करतात. त्यामुळे माहिती असतानाही जीवाला धोका असल्याने अधिकारी, कर्मचारी कारवाई करण्यास धजावत असतात. त्यामुळे कारवाईसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन धडक मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे.