शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

शेतात एक, सातबाऱ्यावर दुसऱ्याच पिकाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST

चंद्रपूर : धान उत्पादन जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असली तरी अन्य पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र ...

चंद्रपूर : धान उत्पादन जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असली तरी अन्य पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र बहुतांश तलाठी शेतात न जाताच सातबारा उताऱ्यावर घरबसल्याच पेरव्याची नोंद करीत असल्याने शेतात एक आणि सातबारावर दुसऱ्याच पिकाची नोंद होत असल्याची प्रकार समोर आला आहे. यातून प्रशासन केवळ कागद रंगविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नुकसानभरपाई मिळवण्यात अनेकांना अडचण होत आहे. असाच प्रकार भद्रावती तालुक्यात उघड झाला आहे.

पाऊस कोसळला की, दरवर्षी शेतकरी शेतात पेरणी करतात. जिल्ह्यात किती हेक्टरवर कोणत्या पिकांची लागवड झाली याची माहिती कळावी यासोबतच पीकविमा भरताना अडचणीचे जाऊ नये आणि नुकसानभरपाई मिळविणे सहजशक्य व्हावे यासाठी नमुना १२ मध्ये तलाठ्यांकडून शेतात घेतलेल्या पिकांची नोंदणी केली जाते. यासाठी तलाठ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन नोंद घ्यावी लागले. मात्र जिल्ह्यातील काही तलाठी घरबसल्याच तसेच काही वेळा शेतकऱ्यांना विचारून नमुना १२ मध्ये पिकांची नोंद करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शासनदरबारी खोटा अहवाल जात आहे, हा प्रकार जिल्ह्यातील बहुतांश गावांत सुरू आहे.

भद्रावती तालुक्यातील एका गावातील शेतकरी शेतात पेरणीही करीत नाही, असे असतानाही मागील ३० ते ३५ वर्षांपासून कधी कापूस तर कधी सोयाबीनचा पेरवा दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतात पेरवा दाखविण्यात आला आहे. त्या शेतामध्ये मोठमोठे वृक्ष असून सर्वत्र झाडेझुडपे आहेत.

बाॅक्स

चौकशी करा, सत्य बाहेर येईल!

जिल्ह्यात धान, सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके घेतली जातात. मात्र अनेकांच्या सातबाऱ्यामध्ये वेगळाच पेरा दाखविला जात आहे. बहुतांश तलाठी घरबसल्या अंदाज घेऊन सातबारा उताऱ्यावर पेरा दाखवित असल्यामुळे शेतकरी पीकविमा तसेच इतर सुविधांपासून वंचित राहत आहे.

बाॅक्स

पीकविम्यापासून वंचित

तलाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर वाट्टेल तसा पेरवा दाखवित असल्यामुळे एखाद्या वर्षी नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्या तुलनेत पीकविमाचे पैसेच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जेवढ्या जागेवर ज्याची पेरणी केली आहे, तेवढीच दाखविल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

बाक्स

काय असते सातबारा उताऱ्यामध्ये

नमुना सातमध्ये भोगवटादार जमीन कसणाऱ्याचे नाव असते, तर नमुना बारामध्ये कोणते पीक घेतले आहे याबाबतची नोंद असते. नमुना आठमध्ये खाते क्रमांक असतो. यात एखाद्याची त्या गावामध्ये असलेल्या जमिनीची मालकी नोंद असते.

बाॅक्स

भद्रावती तालुक्यात असाही प्रकार

भद्रावती तालुक्यातील एका गावामध्ये शेतकऱ्याच्या नावाने जमीन आहे. या जमिनीवर मागील ४० वर्षांपासून मोठमोठे वृक्ष, झाडे-झुडपे वाढली आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यामध्ये दरवर्षी सोयाबीन, कापूस अशी नोंद होत असल्याचा प्रकास उघडकीस आला आहे.

बाॅक्स

शासनाची फसवणूक

शेतामध्ये शेतकऱ्यांनी काय पेरले याची माहिती सातबाऱ्यामध्ये दाखविली जाते. यानुसारच किती हेक्टरमध्ये किती पेरणी केली याचा अनुमान संबंधित विभाग बांधताे व तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जातो. मात्र तलाठी आपल्या अंदाजानुसार सातबारामध्ये पेरवा नोंद करत असल्यामुळे नेमकी किती हेक्टरमध्ये पेरणी झाली. याचा अहवाल चुकीचा होत आहे.

बाॅक्स

शेतकऱ्यांचे मौन

प्रत्येक शेतकऱ्याचे तलाठ्याकडे काम असते. त्यामुळे आपले काम बिघडू नये यासाठी शेतकरी काहीच बोलत नाही. तलाठी जे विचारणार ते मुकाट्याने सांगतात.