शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:06 IST

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : राजुरा येथे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेविषयी मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत क्षेत्र मर्यादेची अट शिथिल केली. जवळपास सर्व शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात एकून ७ हजार २०० कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची ही योजना असून सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी नुकतीच वरोरा येथे बैठक घेऊन सर्व महसूल अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिलेत. विभागीय आयुक्तांना या संदर्भात कालबद्ध उद्दिष्टपूर्ती अपेक्षित आहे. अपलोड करण्यात आलेल्या नावांचा दररोज आढावा घेतला जात असून प्रमुख अधिकाऱ्यांकडे तालुक्यांची पाहणी करणे आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सांगितले.जिल्ह्यामध्ये १५ तालुक्यात यासंदर्भात मोहीम राबविण्यात येत आहे. अपात्रतेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्येदेखील शेतकºयांची नोंद केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, जे करदाता असतील, शासकीय सेवा ,पदाधिकारी, निवृत्तीवेतन धारक, पती-पत्नीच्या दोघांचे नाव असेल, माहिती देण्यास त्यांनी नकार दिला असेल अथवा आपसी वादामध्ये जमीन असेल अशा सर्वांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.वनहक्क पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्या सर्वांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी आपल्या नावाची नोंद करावी. शेतकऱ्यांसाठी आता हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे ज्या खातेदाराच्या नावाने जमीन आहे. त्यांनी आपली नोंद करणे आवश्यक आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.