शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:06 IST

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : राजुरा येथे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेविषयी मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत क्षेत्र मर्यादेची अट शिथिल केली. जवळपास सर्व शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात एकून ७ हजार २०० कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची ही योजना असून सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी नुकतीच वरोरा येथे बैठक घेऊन सर्व महसूल अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिलेत. विभागीय आयुक्तांना या संदर्भात कालबद्ध उद्दिष्टपूर्ती अपेक्षित आहे. अपलोड करण्यात आलेल्या नावांचा दररोज आढावा घेतला जात असून प्रमुख अधिकाऱ्यांकडे तालुक्यांची पाहणी करणे आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सांगितले.जिल्ह्यामध्ये १५ तालुक्यात यासंदर्भात मोहीम राबविण्यात येत आहे. अपात्रतेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्येदेखील शेतकºयांची नोंद केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, जे करदाता असतील, शासकीय सेवा ,पदाधिकारी, निवृत्तीवेतन धारक, पती-पत्नीच्या दोघांचे नाव असेल, माहिती देण्यास त्यांनी नकार दिला असेल अथवा आपसी वादामध्ये जमीन असेल अशा सर्वांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.वनहक्क पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्या सर्वांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी आपल्या नावाची नोंद करावी. शेतकऱ्यांसाठी आता हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे ज्या खातेदाराच्या नावाने जमीन आहे. त्यांनी आपली नोंद करणे आवश्यक आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.